महागाई नियंत्रणासाठी समितीची स्थापना
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.
नवी दिल्ली- महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीमुद्यावरून बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.समितीमध्ये अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, कृषीमंत्री शरद पवार, नियोजन आयोगाचे उपध्यक्ष मॉन्टेंक सिंग अहलुवालिया यांच्यासह आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, हरयाणा, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तिसगड या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
ही समिती महागाई नियंत्रणावर करावयाच्या उपाय योजने बरोबरच, सार्वजनीक अन्नधान्य वितरण व्यवस्थे संदर्भात उपाय योजना सुचवणार आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा