पहिले पान | अर्थजगत

अर्थजगत

दोन वर्षांच्या तुलनेत महागाई दर घटला

16 January, 2012 06:40:00 PM
खाद्यान्नाच्या किमती घसरल्याने डिसेंबर 2011मध्ये महागाईचा दर दोन वर्षांच्या तुलनेने कमी होऊन 7. 47 टक्के झाला आहे.

शेतीविषयक दृष्टिकोन विस्तारतोय..

16 January, 2012 12:19:00 PM हल्ली तरुणही शेतीकडे वळू लागले आहेत. संकरित बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून केळी, कलिंगड, अननस, भाजी, झेंडू ही पैसे देणारी शेती ते करत आहेत. वाढती संकरित बियाणांची मागणी, ठिबक सिंचनसारख्या तंत्राचा वापर याचेच द्योतक आहे. ...
आणखी वाचा

चवळीच्या शेतीकडे कल

16 January, 2012 12:16:00 PM अलीकडे चवळीची व्यापारीदृष्टय़ा लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. अगदी हलक्या, मध्यम किंवा भारी जमिनीतही हे पीक चांगले येते. मात्र, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकासाठी फायदेशीर ठरते. चवळी हे सामान्यत: उष्ण हवामानातील पीक म्हणून ओळखले जाते. ...
आणखी वाचा

उन्हाळी भातशेती फायद्याची!

16 January, 2012 12:11:00 PM देशाच्या अन्नधान्य साठय़ामध्येही या पिकाची महत्त्वाची भूमिका आहे. एकूण अन्नधान्य पिकापैकी 43 दशलक्ष हेक्टर म्हणजेच 30 टक्के एवढा मोठा वाटा भातशेतीचा आहे. राज्यात खरीप हंगामातील भातपिकाखाली सुमारे 14.77 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 34 हजार 900 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भातपीक घेतले जाते. नियमित व नियंत्रित पाणीपुरवठय़ाची सुविधा असलेल्या क्षेत्रात भाताचे उन्हाळी पीक उत्तम येऊ शकते. ...
आणखी वाचा

आंगणेवाडी झेंडूने फुलली

16 January, 2012 12:09:00 PM कोकणातील शेतकरी पिकांबाबत अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहत असल्याची उदाहरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. ऊसशेती हे त्याचे अगदी ताजे उदाहण आहे. केवळ पारंपरिक पिकांमध्ये न अडकता वेगवेगळे प्रयोग करून, विविध पिके घेऊन येथील शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल, याचा विचार करू लागला आहे....
आणखी वाचा

आंबा बागायतदारांचा विम्याला मोठा प्रतिसाद

16 January, 2012 12:07:00 PM अवकाळी पाऊस, तापमानवाढ यासारख्या हवामानबदलांचा संपूर्ण जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. कोकणची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ज्या पिकांवर अवलंबून आहे त्या आंबा, काजूला हवामानबदलाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे मोहर गळून जाणे, अति उन्हामुळे मोहर करपणे यासारख्या दुष्टचक्रात येथील बागायतदार सापडला आहे. गेल्या काही वर्षापासून बागायतदारांच्या नुकसानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नैसर्गिक आपत्तीपासून या फळपिकांना संरक्षण देण्यासाठी सरकारने पीकविमा लागू केला आहे. या योजनेला आंबा बागायतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे....
आणखी वाचा

कर्ज मिळाले तरी एअर इंडिया अडचणीतच

16 January, 2012 10:40:00 AM कर्जाच्या फेररचनेबाबत एअर इंडियाने रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी मिळवली असली, तरी 10 हजार कोटींच्या पुरवठय़ानंतरही एअर इंडियाची बाजारातील आर्थिक प्रतिमा सुधारण्यासाठी त्याचा फायदा होण्याबाबत कर्जपुरवठादार बँका साशंकच आहेत. ...
आणखी वाचा

अपेक्षांचे ओझे

15 January, 2012 11:06:00 AM येत्या 24 जानेवारीला रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक होणार आहे. यामध्ये आता तरी आरबीआय व्याजदर कपातीचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्य कर्जदारांकडून व्यक्त होत आहेत....
आणखी वाचा

सिंगल ब्रँडमध्ये 100 टक्के ‘एफडीआय’

15 January, 2012 11:03:00 AM देशातील सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रामध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीबाबात अध्यादेश जारी करत केंद्र सरकारने क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. ...
आणखी वाचा

सेन्सेक्सची 117 अंकांनी उसळी

13 January, 2012 06:15:00 PM गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 117 उसळी घेतली....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2106 | displaying: 91 - 100