22 January, 2012 04:30:00 AM
मिसळ खावी तर कोल्हापूर, नाशिक नाहीतर पुण्याची. सकाळ झाली की, आजही बरेच खवय्ये देवाला जावं त्या भक्तिभावानं मिसळ खायला जातात. पण मिसळ खाल्ल्यावर कटिंग चहा हवाच. झणझणीत मिसळीची चव जिभेवर घोळवत ठेवून गरमागरम चहाचा चटका जेव्हा बसतो, तेव्हाची मजा शब्दात सांगता येणार नाही; पण काही का असेना.. मिसळ हा मराठी माणसाचं चवीनुसार बदलणारं फ्युजन आहे, एवढं मात्र नक्की.
22 January, 2012 04:30:00 AM
रेल्वे परिसरात पोलिसांनी मारहाण केली, अपघातात मदत केली नाही तसंच, कोणाविरुद्ध नाहक तक्रार नोंदण्यात आली तर, प्रवाशी थेट समीर जव्हेरी यांच्याशी संपर्क साधतात. समीर प्रत्येकाला मदत करतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला हमखास न्याय मिळणार, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ...
22 January, 2012 04:30:00 AM
केवळ राजकारणी किंवा अर्थकारणीच नव्हे, तर सामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक ‘आय ओपनर’ आहे. सर्वसामान्यांना चीन आज क्षणोक्षणी भेटतोय. मुलांच्या खेळण्यांपासून ते अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत चीनने आज भारतातल्या घराघरात प्रवेश केलाय. त्यामुळेच चीनविषयी भारतीयांना कुतूहल आहे आणि 62 च्या युद्धातील पराभवापलिकडे जाणारं हे कुतूहल आहे....
15 January, 2012 04:30:00 AM
‘एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड’ अशी अर्थशास्त्रात एक थिअरी आहे. सध्या कार उत्पादक कंपन्या ग्राहकांचा अक्षरश: पाठलाग करत आहेत. जवळपास प्रत्येक कंपनी किमान 30 ते कमाल 70 हजारांपर्यंत आपापल्या उत्पादनांवर सूट देत आहे. पेट्रोलच्या किमती कडाडल्यानंतर डिझेल मोटारींकडे कल वाढला. त्यामुळे बाजारात डिझेल मॉडेल्स लाँच झाली आहेत. सध्या महागाईनं आपलं डोकं उठवलं असलं तरी हाच काळ कार घेण्यासाठी सर्वात उत्तम आहे. अगदी खराखुरा सुवर्णकाळ आहे. तेव्हा ‘लोहा गरम असताना हथोडा मारनेकी’ संधी साधायला काय हरकत आहे? ...
15 January, 2012 04:30:00 AM
गेल्या वर्षभरात दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये अंदाजे जवळपास 40 नव्या गाडय़ांची भर पडली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या ‘ऑटो एक्स्पो’मध्ये मिळालेल्या माहितीनुसार यंदा 22 नवी चार चाकी व किमान 25 नवी दुचाकी वाहनं बाजारात येणार आहेत....
15 January, 2012 04:30:00 AM
पाहिलं हो मी तुम्हाला. डोळे फुटलेले नाहीत माझे.. आई जगदंबेच्या कृपेने अजून सगळं लख्ख दिसतं!’’ हे एक बरं आहे इथे. जे काही घडतं ते आई जगदंबेच्या कृपेनं, का.सं.च्या मनात विचार आला, म्हणूनच गाव तिथं क्लास काढलेल्या सरांनी रोजनिशी प्रकाशित केली. ...
15 January, 2012 04:30:00 AM
घर सोडलं. सातपूर या नाशिक लगतच्या शहरवजा गावात खिशाला परवडेल आणि बसता-झोपता येईल अशी एक खोली भाडय़ानं घेतली. बँकेतून कर्ज काढलं. संगणक विकत घेतला. पुस्तकं विकत घेतली. त्या संस्थेचा पाठय़क्रम तर मी मिळवलेलाच होता. त्यानुसार अभ्यासाला सुरुवात केली. अक्षरश: कोंडून घेतलं मी स्वत:ला. आणि सहा महिन्याचा तो त्यांचा पाठय़क्रम चारच महिन्यात पूर्ण करत मी स्वत:च स्वत:चं सर्टिफिकेट लिहिलं. झपाटलेला काळ होता तो माझ्यासाठी! रात्र कधी झाली आणि दिवस कधी उजाडला मला कळलंच नाही. कित्येकदा जेवणाचा आलेला डबा तसाच परत जायचा. संगणकाची आणि माझी इतकी काही गट्टी जमली की मी अक्षरश: हरवून जायचो. - लेखमालिकेतला तिसरा भाग....
15 January, 2012 04:30:00 AM
कच्छमधील ग्रामीण स्त्रिया लोकगीतांमधून कृषीमायेचं ऋण व्यक्त करतात. त्यांची लोकगीतं त्यांच्या मूळ कृषी संस्कृतीचं द्योतक आहेत. अशा या कच्छमधून फेरफटका मारताना तिथल्या सांस्कृतिकतेचं झालेलं हे ओझरतं दर्शन....
15 January, 2012 04:30:00 AM
आपण सतत ‘शिक्षण, शिक्षण’ असं म्हणतो. सरकार आणि उद्योजक त्याला ‘हय़ूमन रिसोर्स डेव्हलपमेंट - मनुष्यबळ विकास’ म्हणतात. रिसोर्सिस कोणासाठी? अर्थव्यवस्थेसाठी. मार्क्स यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ लावला. आपल्याला हे जग बदलायचं आहे.’ त्या वाक्याप्रमाणे आपण आतापर्यंत शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचा अर्थ लावला. हा अर्थ ज्यांना खटकतो ते जग बदलायचा प्रयत्न करणार....
15 January, 2012 04:30:00 AM
मराठवाडय़ातल्या बीड जिल्ह्यातील कडा या छोटय़ाशा शहरात मराठवाडा साहित्य परिषदेचं 33वं साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. त्याचं उद्घाटनपर भाषण आजचे आघाडीचे लेखक भारत सासणे यांनी केलं. साहित्यविषयक प्रश्नांकडे मुंबई-पुण्याहून कितीतरी लांब असलेल्या जागी किती गांभीर्यानं आणि सजगपणे विचार होतो आहे याचा अदमास या भाषणावरून येतो. म्हणून त्याचा हा संपादित भाग....