08 January, 2012 04:30:00 AM
सगळ्यांशी जमवून घेणं हा पोहय़ांचा गुणधर्मच आहे. कदाचित त्यामुळेच दिवसाच्या पहिल्या नाश्त्याचा मान पोहय़ाला मिळालेला दिसतो. पोहय़ाकडे ‘मूड एलिव्हेटर’ म्हणून पाहिलं जातं. पोहय़ात जेवढी स्वागतशीलता आहे, तेवढी कोणत्याच पदार्थात नाही. ते ख-या अर्थानं कम्फर्ट फूड आहे.
08 January, 2012 04:30:00 AM
पोर्तुगीजांचं मुंबईतील सर्वात जुनं बांधकाम म्हणून पोतुर्गीज किल्ला आजही उभा आहे. सध्या तो आय. एन्म. एस. आंग्रेच्या अंतर्गत येतो. अर्थात, त्याच्या भिंती आता कोसळल्यात. मुख्य प्रवेशद्वार, सौरघडय़ाळ आणि मनोर हाउस पडझड झालेल्या अवस्थेत आहे....
08 January, 2012 04:30:00 AM
महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी अधिक लिहिलं गेलंय अशा जंगलांपैकी नागझिरा एक आहे. मराठीत मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, किरण पुरंदरे अशा काही लेखकांनी अभ्यास, संशोधन आणि मोठय़ा मेहनतीनं नागझि-याविषयी अप्रतिम पुस्तकं लिहिली आहेत. त्यामुळे नागझि-याला जाण्याची ओढ उजागर होते आणि त्याचा सुखद अनुभवही अनुभवायला मिळतो. ...
08 January, 2012 04:30:00 AM
नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, 13 जानेवारीला, त्यांनीच लिहिलेल्या ‘आठवणीतील मोती’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन राजेंद्र प्रकाशनाच्या वतीने होत आहे. या पुस्तकाला मोहन कुलकर्णी यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा काही भाग....
08 January, 2012 04:30:00 AM
मेलेल्या माणसामुळे जिवंत माणसाला इटाळ होत असेल तर आपल्या शरीराची किंमत काय असेल? मृत्यू मात्र अटळ आहे. तो कसा येतो त्यावर सर्व काही अवलंबून असतं. गौतमाचं तत्त्वज्ञान खूप काही सांगून जातं. त्या घटनेनं मी यात आठ दिवस अस्वस्थ झालो. ती अस्वस्थता मला बैचेन करते. तीच मी लेखक असल्याची साक्ष असेल....
08 January, 2012 04:30:00 AM
शिक्षणव्यवस्था नक्की कशी काम करते? शिक्षण कोणाला मिळतं? कोणाला कोणतं शिक्षण मिळतं? शिक्षण कोणाला? किती? कसं? कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या देशात कशी ठरतात अशा काही प्रश्नांचा पाठपुरावा या सदरातून केला जाणार आहे, दर पंधरा दिवसांनी....
08 January, 2012 04:30:00 AM
मैत्री आणि प्रेम याच्यातील अस्पष्ट अशी रेष कधी कुणाला सहजासहजी कळली आहे का? हे वय आहे का प्रेमात पडण्याचं? अभ्यासावर त्याचा परिणाम होतो तो वेगळा. लहान वय, अपरिपक्व विचार, रिस्क घेण्याची प्रवृत्ती अशानं, येईल त्या प्रवाहात वाहत जाण्याची चूक होऊ शकेल. त्यामुळेच योग्यायोग्याची निवड न करता आल्यानं आई-वडील आणि शिक्षक यांनी त्यांच्या अनुभवाचा सल्ला दिला, तर त्यात चुकलं काय? या पुढे हे सदर पंधरा दिवसांनी प्रकाशित होईल....
08 January, 2012 04:30:00 AM
सीमाभागातल्या मराठी बांधवांवर काय अन्याय होतोय? त्यांना नक्की कुठले दु:ख आहे? कर्नाटक सरकार त्यांना कशा प्रकारे त्रास देत आहे? विविध राज्यांतील भाषिक अल्पसंख्याकांसाठी सरकारने संरक्षक तरतुदी केल्या आहेत. आपली भाषा, लिपी व संस्कृती टिकवण्याचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या 29व्या कलमाद्वारा अल्पसंख्याकांना आहे. तरीही कर्नाटक शासन मराठी भाषिकांना दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखी वागणूक देत आले आहे....
08 January, 2012 04:30:00 AM
नोकरीला लाथ मारून केवळ पेन्शनवरच घर चालवून व्हिसेंट मागील 18 वर्षापासून पोलिस यंत्रणा, गुन्हेगार, राजकीय नेते यांच्याशी एकाकी लढत आहेत. त्यांना डॉक्टर, वकील आणि समाजाकडून या लढय़ासाठी सहकार्य हवंय. त्यांना सध्या आजारानं ग्रासलं आहे. तरीही त्यांनी नवनवे उपक्रम राबवण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी आत्ता तंबाखू खाऊन थुंकणा-याच्या विरोधात ‘गांधीगिरी’ मोहीम सुरू केली आहे....
08 January, 2012 04:30:00 AM
वझेंनी जे आवाहन केलं आहे ते, होमवर्क, क्लासनं पछाडलेल्या शहरी पालकांसाठी आहे. शिकण्याच्या मुक्त पद्धती माहीत नसलेल्या शिक्षकांसाठी आहे; ज्यांनी खरंच चित्रकला विषय गंभीरपणे आणि मुलांनी मोकळेपणानं घ्यायला हवा....