06 October, 2011 07:30:00 AM
आदिवासींवर अत्यंत पाशवी स्वरूपाचे अन्याय होतात. तापमानावर नियंत्रण ठेवता न आल्याने लाकडाची राख झाली म्हणून संतापलेल्या मालकाने मजुरालाच भट्टीत टाकून दिल्याचे प्रकार ऐकिवात आहेत.
05 October, 2011 05:30:00 AM
लावणी ते कापणी दरम्यान जेव्हा मजुरी मिळत नाही आणि निसर्गसुद्धा जगण्याइतकं खायला देत नाही, त्याच काळात गटारी, सर्वपित्री, पिठोरी अमावास्या आणि गौरीगणपती सारखे सर्व सण येतात. याचाच फायदा घेऊन गावागावात मजूर हेरत दलाल फिरतात. सणासाठी म्हणून शे-दोनशे रुपयांची उचल देतात आणि ऑक्टोबर ते मे या काळात वीटभट्टी, कोळसा भट्टी धंद्यात काम करायची बोली करून घेतात. दिवाळीनंतर गावागावातून ट्रक भरून आदिवासी आपल्या मुलाबाळांसह गाव सोडून जगायला जातात.
...
04 October, 2011 05:35:00 AM
नोकरीसाठी अर्ज करून थकल्यावर व्यवस्थेवर ताशेरे ओढणारे कुणीही व्यवस्था बदलण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला तयार नव्हते....
03 October, 2011 06:00:00 AM
1975 पासून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचं नवनिर्माण आंदोलन सुरू होतंच. त्यानंतरची आणीबाणी, त्याविरोधात लोकशाहीतील नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी झालेलं आंदोलन आणि त्यानंतरचा राजकीय सत्तापालट ही माझ्या समाजकार्याच्या प्रारंभीची पार्श्वभूमी होती....
29 September, 2011 07:30:00 AM
काळुबाईच्या नावानं चांगभलं’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. सिनेमा हे समाजप्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. एकाच वेळी शेकडो रसिकप्रेक्षक दृश्य आणि ध्वनीचा आस्वाद घेऊ शकतात....
28 September, 2011 05:30:00 AM
कॅसेटच नव्हे एकंदरीत रेकॉर्डिग क्षेत्रातही अपप्रवृत्तींच्या लोकांचा शिरकाव झाला. कमी खर्चात, सहजगत्या कुठल्याही प्रसिद्ध कॅसेटची कॉपी करून पायरटेड कॅसेट्स आणि सीडीज बाजारात येऊ लागल्या. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला. आजवर सांभाळलेली तत्त्वं सोडणं मला जमलं नाही. त्यामुळे सातत्यानं मतभेद होत गेले आणि परिणामी कृणाल कंपनीतून मी बाहेर पडलो. ...
27 September, 2011 05:30:00 AM
गावी घर बांधलं, भावंडांचं शिक्षण, बहिणींची लग्नं, माझंही लग्न असं सारं याच दरम्यान झालं. सुखाचे दिवस आले होते खरे, पण माझ्या कॅसेट कंपनीत भांडवल गुंतवायला कुणीच तयार नव्हतं. मी काय काम करतोय, काय करणार आहे ते सांगता येत नव्हतं मला. शिवाय मी गाण्यांचं काम करतोय म्हणजे काहीतरी जगावेगळं करतोय असा लोकांचा समज होता....
26 September, 2011 06:30:00 AM
मी मूळचा भाजी विक्रेता. पण जिद्दीने, कष्टाने संगीतक्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करण्याची धडपड सुरुवातीपासूनच होती. भाजीविक्रेता ते कॅसेट-सीडी निर्माता, गीतकार, लेखक, सिनेमांचा दिग्दर्शक असा माझा प्रवास!...
22 September, 2011 05:30:00 AM
दलित, ग्रामीण साहित्य खूप मोठया प्रमाणात लिहिलं गेलं आहे. आदिवासींच्या बाबत मात्र अजूनही फारसं लिहिलं गेलं नाही. त्यांच्यातून जे शोधून पुढे आणायला पाहिजे होतं ते पुढे आलं नाही. याची मला अजूनही खंत वाटते. ...
21 September, 2011 05:30:00 AM
कायदे कानून आणि देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुभावही त्यांच्यासाठी अपुरा पडतो. त्यांना अजूनही स्वातंत्र्यच नाही. अजूनही पोट भरण्यासाठी झगडावं लागतं. त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत नाही, त्यामुळे आपल्या देशात खरी लोकशाही नांदतेय असं म्हणता येणार नाही. जे काही चाललं आहे ते चुकीच्या वाटेने जात आहे. म्हणूनच शेतकरी, आदिवासी, दलित, कष्टकरी उद्ध्वस्त होत असून देशाला भांडवलदारी व्यवस्थेने जखडून टाकलं आहे. ...