पहिले पान | महाकौल
  • image

    टक्कर

    बंडखोरांचे आपटबार, अपक्षांचे लवंगी फटाके आणि मातब्बर तगडय़ा उमेदवारांचे अ‍ॅटमबॉम्ब यामुळे प्रचारात दिवाळीची रंगत आणणा-या विधानसभा निवडणुकीत मंगळवारी मतदार मतदानाचे भुईनळे उडवणार आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी मातब्बरांना घाम फुटावा अशी परिस्थिती बंडखोर आणि मनसे फॅक्टरमुळे आली आहे. शिवाय, घरभेद्यांनी इतरत्र केलेला घरोबाही अनेकांच्या काळजाला घरे पाडणारा ठरला आहे. राज्यातील काही लक्ष्यवेधी लढतींचा हा आढावा...
  • image

    आघाडी सरकारने केलेला विकास लोकांसमोर आहे

    मुंबईच्या विकासासाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा निधी आणला, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून आलेल्या निधीतून मुंबईचा चेहरामोहरा बदलला आणि एमएमआरडीएने या शहराचा विकास केला, तो जनतेसमोर आहे- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर
  • image

    तुझा मुद्दा काय?

    ‘तुही यत्ता कंची ?’ असा प्रश्न नामदेव ढसाळांनी विचारला तेव्हा सबंध मराठी सारस्वत थरारले होते. केवळ साहित्याच्या क्षेत्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातही या पँथरची दहशत निर्माण झाली होती...
  • बंडखोरीमुळे चांदवड, भुजबळांमुळे नांदगाव चर्चेत

    माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केलेल्या बंडखोरीमुळे चर्चेत आलेला चांदवड मतदारसंघ, काँग्रेस-जनता दल यांच्यातील पारंपरिक लढतीमुळे मालेगाव मध्य मतदारसंघात निर्माण झालेली उत्सुकता नांदगाव मतदारसंघाप्रमाणेच ताणली गेली आहे.