मल्टिप्लेक्स
अतिथी देवो भव:!
विनोदाला असलेली कारुण्याची झालर, हसता हसता नकळतपणे डोळ्यांतून पाणी आणण्याची असलेली क्षमता ही उत्तम, दर्जेदार विनोदाची कसोटी मानली जाते. ‘अतिथी तुम कब जाओगे?’ आश्चर्यकारकरीत्या या कसोटीला खरा उतरतो.
भन्नाट कॅलिडोस्कोप
रस्त्यावरच्या प्रवासात घडणा-या चित्रपटांचं, रोड मूव्हीजचं एक स्वतंत्र दालन हॉलिवुडमध्ये आहेत. आपल्याकडे मात्र आता कुठे या प्रकारचे सिनेमे बनायला सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या रखरखीत, वैराण वाळवंटातून दिग्दर्शक देव बेनेगल प्रेक्षकाला मस्तपैकी भटकून आणतो आणि तिथल्या अस्सल हाडामांसाच्या माणसांची ओळख करून देतो. ...पत्त्यांचा डाव...भुईसपाट
‘तीन पत्ती’त अनेक दोष आहेत आणि ते सगळेच इतके ढळढळीत आहेत नेमकं कशा कशाबद्दल लिहावं, हा प्रश्नच आहे. अत्यंत ढिसाळ आणि दिशाहीन पटकथेमुळे चित्रपटाची वाट लागली आहे ...हा कॉल घ्या!
सायकॉलॉजिक थ्रिलर या प्रकारात हा चित्रपट मोडतो. त्यामुळे रहस्य, गूढ हा या चित्रपटाचा गाभा आहे आणि कुठल्याही रहस्यपटात रहस्याची उकल विश्वसनीय आणि तार्किक असावी लागते. सुदैवाने ही गरज ‘कार्तिक..’मध्ये पूर्ण होते. यातला रहस्यभेद फारसा धक्कादायक आहे, अशातला भाग नाही. परंतु, तो अतार्किक नाही. इंग्रजीत ज्याला ‘लॉजिकल कन्क्ल्युजन’ म्हणतात, त्या प्रकारातला आहे आणि हिंदी चित्रपटापुरती ही दुर्मीळ गोष्ट आहे. ...ऑल फॉल डाउन
स्वत: दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसल्यानंतरही अद्याप ते कॅमे-याच्या मोहातून बाहेर पडायला तयार नसल्याचा प्रत्यय ‘रिंगा रिंगा’ बघताना येतो. पटकथेला दिलेलं दुय्यम महत्त्व आणि तांत्रिक करामती दाखवण्याचा हव्यास यामुळे एका चमकदार कल्पनेचा जीव गेला आहे....ये बात पक्की!
हृषिकेश मुखर्जीच्या चित्रपटांनी १९७० आणि ८०चा काळ गाजवला. साध्यासुध्या, अस्सल हाडामांसाच्या माणसांच्या सरळ कथा आणि त्यांची नर्मविनोदी हाताळणी यामुळे हृषिदांचे सिनेमे आजही हवेहवेसे वाटतात. दिग्दर्शक केदार शिंदेचा ‘तो बात पक्की’ नेमका त्याच प्रकारचा चित्रपट आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो ब-यापैकी यशस्वीही होतो....देर आए नादुरुस्त आए
‘प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो’ हे सूत्र आता इतकं घिसंपिटं झालं आहे की, या चित्रपटांमधलं नावीन्य आता पूर्णत: संपून गेलं आहे. जोपर्यंत कल्पक लेखक या विषयावर आधारित नावीन्यपूर्ण पटकथा घेऊन येत नाही, तोपर्यंत असे चित्रपट पाहताना, हे यापूर्वीच आपण बघितलं, असं सातत्याने वाटणं (देजा वू) स्वाभाविक आहे. ‘माय नेम इज खान’चा नेमका तोच प्रॉब्लेम आहे....मालवणीच्या गल्लीबोळात भरकटलेला स्ट्रायकर
चमकदार कल्पना घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत पॉलिश्ड सिनेमा करणा-या दिग्दर्शकांची एक फळी सध्या कार्यरत आहे. दिग्दर्शक चंदन अरोराचा ‘स्ट्रायकर’ याच पठडीतला सिनेमा आहे. पण कच्चं लिखाण, नीरस कथानक, रोमांचकतेचा अभाव यामुळे स्ट्रायकर डझंट स्ट्राइक अ कॉर्ड विथ ऑडियन्स....संगमावर जायलाच हवं!
चित्रपटाच्या सजावटीपेक्षाही थेट भाष्य करणारी सकस कथा आणि आपल्याला जे सांगायचंय ते कसलाही आडपडदा न ठेवता मांडणारा दिग्दर्शक यामुळे ‘रोड टु संगम’ अविस्मरणीय होतो....उथळ ‘रण’चा खळखळाट फार
निव्वळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ‘रण’ काठावर पास होण्यासारखा आहे, पण मीडिया आणि राजकारणी यांच्या संबंधावर बेतलेल्या या चित्रपटात इतक्या भीषण चुका आहेत की, विचारता सोय नाही....मोस्ट कमेंटेड


‘मास्को’ द ड्रामा