‘थाने’ वादळाच्या बळींची संख्या 47
थाने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कुड्डालोर आणि पुदुचेरीतील जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले असले तरी बळींची संख्या वाढतच असून ती 47 झाली आहे.
कुड्डालोर- थाने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कुड्डालोर आणि पुदुचेरीतील जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. वीजपुरवठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर वादळामुळे कोसळून पडलेली झाडे आणि ढिगारेही उचलण्यात आले आहेत. या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. कुड्डालोर जिल्हय़ात दुर्गम भागात आणखी पाच जणांचा वादळामुळे बळी गेल्यामुळे बळींची एकूण संख्या आता 47 वर पोहोचली आहे. थानेमुळे तामिळनाडूत 40 तर पुदुचेरीत सात जण बळी गेले आहेत. दरम्यान, खराब हवामान कायम असल्यामुळे मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्याचा नियोजित दौरा रद्द केला आहे.
थाने चक्रीवादळाचा फटका तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्हय़ाला सर्वाधिक बसला असून 18 हजार लोकांनी शासकीय इमारती, शाळा आणि लग्नांच्या सभागृहात आश्रय घेतला आहे.पुदुचेरीतही अशीच परिस्थिती आहे. आश्रय घेतलेल्या सर्वाना भोजन तसेच इतर अनेक जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा