भगवद्गीतेचा अध्याय संपला
भगवत् गीतेवर बंदी घालण्याची याचिका सायबेरियातील टॅमस्क येथील न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
मॉस्को- धार्मिक सलोख्याल बाधा पोहचत असल्याचे कारण देऊन भगवद्गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियातील न्यायालयाने फेटाळून लावली. भारत सरकारने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
इस्कॉनच्या ‘भगवद्गीता अॅज इट इज’ या पुस्तकाचा रशियन भाषेत अनुवाद करण्यात आला होता. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्थानिक चर्चने केली होती. त्यासंदर्भात सैबेरियातील तोमस्क शहरातील न्यायालयात याचिका करण्यात आली होती. याचे पडसाद भारतात उमटल्यानंतर संसदेत सर्पपक्षीय खासदारांनी बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा असल्याची भावना व्यक्त केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून हा खटला जूनपर्यंत स्थगित केला आहे.
केंद्र सरकारने या निर्णयाचे स्वागत करून रशियन सरकारचे आभार मानले. ‘भगवद्गीतेवर बंदी हा भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. रशियातील न्यायालयाने बंदीची याचिका फेटाळून चांगले काम केले. रशियन सरकारने यासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे आभार,’ अशा शब्दात केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा