साय-फाय

मटार.. नव्हे विजेचे दाणे!

सौरऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न सध्या जगभर सुरू आहेत. खनिज तेलांचे साठे उत्तरोत्तर कमी होऊ लागल्यामुळे पर्यायी ऊर्जा आवश्यक झाली आहे. यामुळे आपण ऊर्जेचेच वेगवेगळे स्रेत शोधत आहोत. असे स्रेत निसर्गात शोधताना अनेक झाडांमध्ये ही ऊर्जा लपलेली असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. याला मटाराचा वेलही अपवाद नाही..

..तर डम्पिंग ग्राऊंड सोन्याच्या खाणी बनतील!

सध्या देशात ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि होत आहेत. त्यापैकी ब-याच समस्या शहरातील घनकच-याच्या नियोजनाशी संबंधित आहेत. देशातील धान्यटंचाईवर घनकचरा हा खास उतारा आहे. ग्रामीण जीवन उजाड होत आहे. त्याचं उत्तर घनकच-याशी निगडित आहे....
आणखी वाचा

इंधन बचतीच्या छोट्या क्ऌप्त्या

इंधनाचा साठा जगभर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. या परिस्थितीत इंधनाची बचत करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही बचत तुम्ही-आम्हीच करू शकतो. त्यासाठी वेगळं काही करयाची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींतूनही ती होऊ शकते....
आणखी वाचा

हवामान बदल अटळ?

पृथ्वीचा भौतिक चेहरामोहरा सतत बदलत आला आहे. तिचं चुंबकीय क्षेत्र स्थिर नाही. तसंच हवामानसुद्धा अस्थिर आहे. निसर्गात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही तर पर्यावरणाला ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवण्याचा अट्टहास कितपत योग्य आहे किंवा तो किती यशस्वी ठरू शकतो? बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे व या बदलाशी जुळवून घेणं आपल्या दृष्टीने हितकारक होऊ शकतं....
आणखी वाचा

डंपिंग ग्राउंडचं काय करायचं?

सध्या आपल्याकडे ब-याच शहरांत डंपिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही डंपिंग ग्राउंड जिथे आहेत जिथे आहेत त्याच्या आजूबाजूच्या गावातील गावक-यांचा त्यांना विरोध आहे. यात अनेक प्रश्न गुंतले असल्याने डंपिंग ग्राउंडचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे...
आणखी वाचा
image

वर्तमानपत्रांद्वारे विज्ञान प्रसार

वाङ्मय क्षणभंगुर असलं तरी लेखन किंवा साहित्य हे चिरकाल टिकतं. साहित्याचं स्वरूप बदललं, वाचक बदलले, त्यांच्या गरजा बदलल्या, साहित्य प्रसारणाचा वेग बदलला तरी अक्षररूपातील साहित्य कायम टिकून राहणार आहे, एवढं मात्र खरं, कारण मुद्रित शब्दांचा पिढय़ान् पिढय़ा मानवी अंतर्मनात पडलेला प्रभाव पटकन संपुष्टात येणार नाही. ...
आणखी वाचा
image

भारतातील हिमयुगाच्या स्पष्ट -अस्पष्ट खुणा

हिमयुगाचा अभ्यास करणा-या वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, या जगातलं सर्वव्यापी, पहिलं हिमयुग सुमारे पंचावन्न कोटी वर्षापूर्वी अवतरलं होतं. या हिमयुगाचे पुरावे जगाच्या कानाकोप-यात आढळतात. उत्तर भारतातही या हिमयुगाचे पुरावे जतन झालेले आहेत, पण दक्षिण भारतात मात्र परिस्थिजन्य पुराव्याच्या आधारे हिमयुगाच्या निष्कर्षाप्रत पोहोचावं लागतं....
आणखी वाचा
image

हिमकल्लोळ!

हिमालयाच्या पायथ्याशी किंवा कोणत्याही हिमरांगांच्या सान्निध्यात राहणा-या लोकांचं जीवन खडतर असतं असं आपण बरेचदा वाचतो. भूकंप, हिमकडा कोसळणं अशा घटना घडल्या की मगच या खडतर जीवनाची आणि आपली ओळख होते. आपण प्रसारमाध्यमांतून याविषयी वाचतो, हळहळतो. हिमकडा अर्थात अ‍ॅव्हलान्श कोसळण्याची अगदी ताजी घटना काश्मिरात घडली आणि त्याखाली दबून आपल्या शूर जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुन्हा एकदा सा-या जगाचं लक्ष हिमाच्छादित पर्वतरांगांकडे वेधलं गेलं....
आणखी वाचा
image

मोनोरेलची धाव!

मुंबईत लवकरच मोनोरेल धावणार आहे. जमिनीपासून विशिष्ट उंचीवर सुनियोजित पद्धतीने बांधलेल्या खांबावरून धावणा-या या वाहतूक व्यवस्थेमुळे मुंबईतील ट्रॅफिकचा ताण हलका होणार आहे. तसंच दररोज प्रवास करणा-या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे....
आणखी वाचा
image

समुचित गौरव

पारंपरिक बायोगॅस सयंत्राना लागणा-या ४० किलो शेणाऐवजी या प्रणालीला फक्त एक किलो जैव-खाद्य लागतं आणि त्यातूनच ५०० ग्रॅम गॅस तयार होतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजवाडय़ात हे सयंत्र बसवण्यासाठी इंग्लडचे इंग्लडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना आमंत्रित केलं होतं. महाराष्ट्रातच आजवर अशी ७०० सयंत्रं उभारण्यात आली असून, ग्रामीण भागाबरोबरच शहरी श्रमातही ती उपयुक्त ठरत आहेत. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 102 | displaying: 1 - 10