11 February, 2012 04:00:00 AM
उच्चवर्णीय स्त्री ही ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ होती, असे कितीतरी मुकाटय़ाने जळून गेलेल्या ‘खानदानी’ कुटुंबातील स्त्रियांबद्दल म्हटले जाते. पण आता उच्चवर्णीय स्त्रियांना न्याय मिळाला तरी लपवला जातो याचे कारण ही ‘अळीमिळी गुपचिळी..’ असा पवित्रा. म्हणजे काय तर ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ ते ‘व्हिक्टरी ऑफ सायलेन्स’.. पण नंतर मात्र इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही कागदपत्रे आपोआप बाहेर काढली जातील. त्यावेळी मथुरा, भंवरीपेक्षाही जास्त गाजतील त्या अशा मुली. तेव्हा भंवरी वगरे कुठेतरी कोप-यात असतील.
29 January, 2012 07:30:00 AM
मिर्जा ग़ालिब व शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मी म्हटले आणि काहीजणांनी यावर टीका केली. म्हणजे टीकाकार म्हणाले की असे असेल तर भारतरत्नाची उपाधी राम आणि गौतम बुद्ध यांना का देऊ नये? आणि तात्या टोपे, त्यांना तर परमवीरचक्र द्यायला पाहिजे....
29 January, 2012 07:30:00 AM
ज्या पक्षाने लोकानुरंजनाच्या घोषणा केल्या तो पक्ष सत्तेत आल्यावर त्यांचे पालन करतो काय? गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचा वीज प्रश्न अतिशय गंभीर बनला. आजही या किचकट प्रश्नाला हात घालायचीही िहमत कोणाला होत नाही. फुकट किंवा अल्प दरातील अन्नधान्याच्या घोषणेने तर मोठाच अनर्थ उभा राहिला आहे....
29 January, 2012 07:30:00 AM
कृषी-वित्त व्यवस्थेतील सकारणात्मक दोष दुरुस्त्यांमुळे कृषी व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल, अशी स्थिती विसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्माण झाली. ...
22 January, 2012 01:35:00 PM
यंदाच्या सांगली येथील 92 व्या नाटय़संमेलनात पारंपरिक दिंडीची जागा पथनाटय़े घेणार असल्याची वार्ता ऐकूनच हे संमेलन नित्याचा गुलाल उधळण्यात आणि फेटे फडकवण्यात धन्य मानणार नाही, असे तीव्रतेने वाटले.कार्यक्रमसमितीत वामन केंद्रे, विजय केंद्रे, शफाअत खान, जयंत पवार, रवींद्र पाथरे, सुरेश खरे यांची नावे वाचून तर हे संमेलन काही वेगळाच रंग धारण करेल, याची शक्यता बळावली. अध्यक्षस्थानी श्रीकांत मोघे यांच्याबरोबर स्वागताध्यक्ष म्हणून प्रायोगिक रंगभूमीवरचे बिनीचे शिलेदार अमोल पालेकर यांचे नाव मुक्रर झाल्याचे ऐकून तर नव्या नांदीचे सूर आता ऐकू येणार याची खात्रीच पटली....
22 January, 2012 12:34:00 PM
सांगली येथे 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घघाटक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर यांनी आपल्या भाषणात काही रोकठोक मते व्यक्त केली... त्यातील काही भाग..... ...
22 January, 2012 11:53:00 AM
आजमितीस 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये आज हा वर्ग खरोखरीच मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या वाढलेल्या प्रेक्षकवर्गामुळेच नाटय़कलेच्या संदर्भामध्ये खूपच आशादायक असं काही घडतं आहे, घडणार आहे.
...
15 January, 2012 07:30:00 AM
मला वाटतं, हा कालखंड आव्हानात्मक आहे. त्याला भिडण्याचे मार्ग आपले आपण काढले पाहिजेत. लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यासाठी कोणत्याही प्रोडय़ूसर्सची गरज नाही- काडीची गरज नाही. अतिशय ताण येतो, त्रास होतो, शरीराची झीज होते. खेडेगावात जाऊन राहायचं तर माझा संपूर्ण अहंकार गळून पडतो. आपण कुठल्या थिएटरविषयी बोलतोय? आपण ज्या थिएटरविषयी बोलतोय जिथे बाजारकेंद्री व्यवस्था आहे. जिथे माणूस विकला जातोय, प्रत्येक गोष्ट विकली जातेय आणि इथे माणसांचे प्रश्न भयानक आहेत.
...
15 January, 2012 07:30:00 AM
साधनांचा वापर हा प्रमाणाबाहेर होत आहे का? या वादाचा निष्कर्ष निघणे तर दूर; आपण हा प्रश्न उपस्थितच करत नाही आहोत, असे मला वाटते. पुढच्या 25 वर्षासाठी आठ टक्के ते नऊ टक्के आर्थिक वाढ व्हायला आपल्याला हवी असेल तर त्यासाठी लागणारी साधने; कोळसा, पाणी, तेल, खनिजे वगैरे पुरत्या प्रमाणात आहेत का याचा विचार आपण केलेला नाही. हा विचार न करताच विकासाची ही वाट आपण सहजपणे योग्य आणि साहजिक म्हणून कशी काय स्वीकारली?...
08 January, 2012 11:56:00 AM
निर्यात कमी झाल्यावर उत्पादनाचा उच्चांक गाठून वाढीव उत्पादनक्षमता निर्माण केली गेली. पण निर्यात कमी होऊन अर्थव्यवहाराची गती मंदावली की, ही उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी राहणार नाही आणि परकी गुंतवणूक घटणार. ही लक्षणे असे दर्शवितात की, चीनचे विमान बरेच उंचावर उडत न राहता खाली विमानतळावर उतरू लागेल तेव्हा जमिनीवर जोरदारपणे आपटले, तरी नवल नाही. असंतोषामुळे वाढत्या प्रमाणात नागरिक उठाव करतील, अशी भीती चिनी सरकारला वाटते.. जागतिक महासत्ता होऊ पाहाणाऱ्या चीनसमोर असणाऱ्या आव्हानांचा ऊहापोह करणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध....