स्त्रीविधा
अल्पवयात नको लग्नाची बेडी...
26 August, 2010 07:20:00 AM
बालविवाहासाठी संबंधित गावच्या पोलिस पाटलाला जबाबदार धरण्यात येतं. लग्न लावणारे भटजी संबंधित नवरा-नवरीचे जन्मतारखेचे दाखले मागतात. मंगल कार्यालयात बुकिंगसाठी गेल्यास तिथेही जन्मतारखेचे दाखले पाहिल्याशिवाय कार्यालय उपलब्ध करून दिलं जात नाही. बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. नुकत्याच झालेल्या बालविवाह प्रतिबंधक जनजागृती सप्ताहानिमित्त..
कारभारणींची काटेरी वाट..
26 August, 2010 06:25:00 AM दीड तपांच्या वाटचालीनंतर स्त्रिया सत्तेत थोडय़ाशा रुळलेल्या, स्थिरावलेल्या दिसतात. सत्तेतल्या कारभारणींच्या समस्या आजही कमी झाल्या नसल्या तरी परिस्थितीशी जुळवून घेऊन काम करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं आहे....पोरींन सोशल नेटवर्किंग करताना जपून...
26 August, 2010 05:55:00 AM ऑनलाइन ‘चव्हाटा’ असं वर्णन केल्या जाणाऱ्या सोशल नेटवर्किंग साइट्स हळूहळू ‘अन्सोशल’ होऊ लागल्या आहेत. विशेषत: महिला-लहान मुलांच्या बाबतीत या साइट्सवर अनेक धोकादायक प्रकार सुरू झालेत. त्यामुळे या साइट्सवर जपूनच चॅटिंग करायला हवं. ...खुल्या वातावरणात मंगळागौर!
19 August, 2010 07:30:00 AM मंगळागौरीचा सण पूर्वी महिला उत्साहात साजरा करायच्या. झिम्मा, फुगडी, बसफुगडी, गोफ असे अनेक खेळ या दिवशी खेळले जायचे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौरीसाठी त्यांच्याकडे वेळच नाही. म्हणूनच महिलांच्या नवीन पिढीला मंगळागौरीची, या दिवशी खेळल्या जाणा-या खेळांची माहिती व्हावी तसंच मंगळागौरीच्या पूजेत सर्व जातीच्या महिलांना सहभागी होता यावं, या उद्देशाने निसर्गाच्या सान्निध्यात मंगळागौर साजरी करण्याचा प्रयोग अलिकडे सुरू झालाय....लज्जारक्षणाची बुद्धी तरी दे रे!
19 August, 2010 08:00:00 AM ‘ड्रेसकोड’ची चर्चा बरीच झाली आणि विरूनही गेली. पण पुण्याजवळच्या पार्टीत पकडल्या गेलेल्या मुलींचे फोटो पाहून एका मैत्रिणीला पुन्हा प्रश्न पडला, ‘जिला स्त्रीत्वाचं प्रदर्शन करावं लागतं ती स्त्री मुक्त कशी?’ त्या अस्वस्थतेतून मांडले गेलेले हे मुद्दे.. ‘स्त्रीमुक्ती’ला थेट आव्हानच देणारे.. ...मुलींना खेळू द्या की..
12 August, 2010 08:25:00 AM कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने नुकताच जागतिक नेमबाजी स्पर्धेत जागतिक विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावलं. एरवी महाराष्ट्रीय मुली क्रीडाक्षेत्रात गुणवत्ता असूनही देदीप्यमान कामगिरी करू शकत नाहीत, या नियमाला ती अपवाद ठरली. दुसरीकडे मुंबईसारख्या शहरातील मुलींचं खेळणंच खुंटत चाललंय. अलीकडेच राष्ट्रीय खो-खो स्पधेचं अजिक्यपद जिंकणा-या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात एकेकाळी खो-खोची खेळपट्टी गाजवणा-या मुंबईतील एकाही मुलीचा समावेश नव्हता. मुंबईत करिअरच्या अनेक वाटा खुल्या असल्याने खेळासारख्या पर्यायांचा विचार केला जात नाही; की अजूनही पालकांची मानसिकता बदललेली नाही?...पर्यावरणाची दोरीही तिच्याच हाती..
12 August, 2010 08:00:00 AM खेडय़ापाडय़ांत आजही चुलीवरच स्वयंपाक केला जातो आणि त्यासाठी लागणा-या लाकडासाठी जंगलांची तोड होते. अशा परिस्थितीत महिला बचत गटांकडे वनांची जबाबदारी सोपवल्यामुळे त्यांची तोड निश्चित कमी होईल आणि वनांच्या संवर्धनाची जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडतील....असुरक्षित मुंबई आणि देशही!
12 August, 2010 07:30:00 AM मुंबईत रात्री बारा वाजता दिवस उगवतो, असं म्हटलं जातं. या महानगरातल्या सगळ्या गोष्टीच थोडय़ा आश्चर्यात टाकणा-या म्हणूनच रात्री शेवटच्या गाडीनं प्रवास करणाऱ्या महिलांना पाहून अनेकदा ...कौटुंबिक हिंसाचार कायद्याचं काय?
05 August, 2010 05:30:00 AM राहुल महाजन आणि डिम्पीच्या लग्नाची जितक्या चवीचवीने चर्चा झाली तितकंच चर्वितचर्वण तिने त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर झालं. आपल्या पायावरच्या जखमा दु:खी भाव चेहऱ्यावर आणून मीडियाला दाखवणा-या डिम्पीने त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही तरी कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा झाली. ‘महिलांचे कौटुंबिक छळापासून संरक्षण अधिनियम 2005’ हा कायदा वेगवान निकाल आणि इतर महत्त्वाच्या तरतुदींमुळे महिलांसाठी आशेचा किरण ठरला, पण एकूणच समाजाच्या मानसिकतेने आणि अमबजावणीतल्या अडथळ्यांमुळे तोही निष्प्रभ ठरतोय की काय, अशी भीती आहे.....मोस्ट कमेंटेड



राशीभविष्य