जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.
जालना- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.
रामगव्हाण येथील बाळू नागरे आणि त्यांच्या मित्रांनी पारधी समाजातील दोन मुलींची छेड काढली. यानंतर पारधी समाजातील लोकांशी आणि बाळू नागरे यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. बाळू नागरे यांनी स्वतःजवळ असलेली बंदूक काढून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पारधी समाजातील वर्धमान पवार हा ठार झाला. शेतातील पायवाटेवरून गेल्या अनेक दिवसांपासून या दोन गटांमध्ये वाद सुरू होता.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा