महाराष्ट्र
जागा मिळेल तेथे टर्मिनस!
25 August, 2010 10:25:00 AM
कोकण रेल्वेचे टर्मिनस कुठे होईल, याबाबत रेल्वे बोर्डाची मंजुरी अद्याप आलेली नाही. जागा मिळेल तेथे टर्मिनस उभारावे. मात्र ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हावे, अशी स्पष्टोक्ती महसूलमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे केली.
नक्षलवादविरोधाचा ‘छत्तीसगड पॅटर्न’ महाराष्ट्रात
25 August, 2010 01:10:00 AM महाराष्ट्र सरकारने गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात ‘छत्तीसगड पॅटर्न’राबवत एकाच बॅचच्या तीन अधिका-यांना एकत्र आणले आहे....विकासकार्याला हातभार लावा- नितेश राणे
24 August, 2010 10:10:00 PM स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी विकासकार्याला हातभार लावावा, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केले आहे. ...सोलापूरमध्ये माळढोक पक्षिगणना
24 August, 2010 11:25:00 AM दुर्मीळ पक्षी असलेल्या माळढोकची गणना येत्या 29 ऑगस्ट रोजी होणार असून त्यासाठी नान्नज येथील माळढोक अभयारण्यात 38 निरीक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत....विजयदुर्ग बंदरासाठी जागा निश्चित
24 August, 2010 11:20:00 AM नियोजित विजयदुर्ग बंदराची जागा निश्चित करण्यात आली असून ‘गिर्ये बे’जवळचा समुद्रकिनारा बंदर बांधण्यासाठी निवडला आहे....खैरलांजी प्रकरणी स्वतंत्र वकील?
24 August, 2010 10:35:00 AM खैरलांजी प्रकरणी सीबीआयने आपली बाजू खंबीरपणे मांडावी म्हणून त्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र वकिलाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...करुळ घाटात कठडय़ांचे बांधकाम
24 August, 2010 12:15:00 AM करुळ घाटमार्गाची गेल्या पाच वर्षांत दुरवस्था झाली होती. निकृष्ट दर्जाचे आणि ढासळू लागलेले संरक्षककठडे तसेच काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यामुळे हा घाट धोकादायक बनला होता. या घाटातील रस्ते आणि कठडय़ांच्या डागडुजीचे काम आता सुरू झाले आहे...देवगडचे मच्छीमार चिंताग्रस्त
23 August, 2010 11:50:00 PM ‘एनसीडीसी’मार्फत मच्छीमारांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र कर्ज घेणारे मच्छीमार कधीच नौकांवर सापडत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रॉलर समुद्रात लोटून मासेमारी सुरू करायची असल्यास खलाशी मिळवण्यासाठी मच्छीमाराला कर्नाटक किंवा केरळ गाठावे लागते. तेथे जाऊन ‘अॅडव्हान्स’ दिल्याशिवाय खलाशी हजर होत नाहीत. ...जातीचे दाखले मिळवताना आदिवासींची तारांबळ
24 August, 2010 04:15:00 AM आपल्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून त्यांचे पालक रोजगारावर पाणी सोडून जातीचे दाखले मिळवण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहे. सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दरसाल एक हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. ...भिवंडीच्या समस्यांचे आयुक्तांपुढे आव्हान
24 August, 2010 03:30:00 AM मूलभूत समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ढिम्म पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. या समस्या सोडवण्याचे आव्हान भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्यापुढे असून ते यातून शहराचा कायापालट कसा करतात, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे. ...मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य