कित्येक वर्षे आपल्या सत्कर्मानं, गुणवत्तेनं, निष्ठेनं किंवा कुकर्मानं, राक्षसी आकांक्षेनं समाजात, देशात, जगात ठसा उमटवणा-या अनेक व्यक्ती या वर्षी आपल्यातून निघून गेल्या. काहींच्या मृत्यूमुळे सार्वत्रिक समाधानाचे हुंकार निघाले, तरी कित्येक महनीय व्यक्तींच्या जाण्यामुळे सोडलेले उसासे हाच सरत्या वर्षाचा दु:खद वारसा ठरला.
सन 2011 हे भारतीय क्रीडा इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं. याच वर्षी एप्रिल महिन्यात भारतानं दुस-यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. टी-20 क्रिकेटचं अवडंबर कितीही वाजवलं गेलं, तरी अजूनही 50 षटकांच्या वर्ल्डकपचं महत्त्व कायम आहे. त्यामुळे हा विजयही 1983 मधील अजिंक्यपदाइतकाच महत्त्वाचा मानावा लागेल. याच वर्षी भारताला कसोटी मालिकेत इंग्लंडकडून 0-4 असा व्हाइटवॉश स्वीकारावा लागला, ही बाब नामुष्कीची मानावी लागेल. बार्सिलोना फुटबॉल क्लबचा दबदबा या वर्षाचं आणखी एक वैशिष्टय़ मानता येईल. क्रीडापटूंना भारतरत्न मिळावं हा मुद्दा यंदा चर्चिला जाऊ लागला, हेही नसे थोडके. गगन नारंगला यंदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला, ही त्याच्या मेहनतीला मिळालेली पावतीच ठरते.
...
2011 या वर्षभरातील राजकीय घडामोडींचा उहापोह......
विसावे शतक संपायला तब्बल एक दशक बाकी असताना कवी दिलीप चित्रे यांनी ‘शतकाचा संधिकाल’ या नावाने सदर लिहून त्या शतकाने निर्माण केलेल्या आव्हानांचा, प्रश्नांचा आणि घडामोडींचा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य लक्षात घेऊन उहापोह केला होता....
विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात मिळणारा टॅबलेट पीसी ‘आकाश’ असो की, एमबीबीएससाठीची केंद्रीय ‘नीट’ परीक्षा असो, बनावट विद्यार्थी शोधण्यासाठीची पटपडताळणी मोहीम असो की, अभिमत विद्यापीठांचे प्रकरण असो; शिक्षण क्षेत्रातल्या अनेक गोष्टींनी 2011 मध्ये चर्चेत ठळक स्थान मिळवलं. शिक्षणपद्धतीत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत राज्य आणि केंद्र सरकारांनी अनेक निर्णय घेतले....
मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेमधील काही देशांचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकणारे उठाव, आंदोलने, क्रांती, चळवळी यांचा सरत्या वर्षावर प्रामुख्याने ठसा उमटला आहे....