भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष २८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तब्बल १२५ र्वष एक पक्ष एका देशाच्या राजकारणात तळपत राहिल्याची उदाहरणं जगात मोजकीच आहेत. काँग्रेसनं घडवलेला इतिहास कुणी नाकारू शकत नाही.. या १२५ वर्षाचा इतिहास प्रत्येक भारतीयासाठी देशाभिमानाची ठेवच ठरला आहे..
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राजधानी दिल्लीतील मुख्यालय ‘अकबर रोड’वर आहे, हे तेथे न गेलेल्यांनाही माहीत असते.. आता मात्र हा पत्ता बदलणार आहे. कोटला रोडवर लवकरच पक्षाच्या मुख्यालयाची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे!
...
सोमवारपासूनच (२८ डिसेंबर) वर्षभरातल्या विविध उपक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, सदस्य नोंदणी वाढवणे, काँग्रेसचा संदेश गावोगावी पोहोचवणे असे उपक्रम पुढच्या २८ डिसेंबर २०१० पर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार आहेत. ...