Home | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

ठेकेदार उमेदवार कसा बनतो?

निवडणुका आल्या की, नगरसेवक दारोदार फिरून मतांचा जोगवा मागताना दिसतात. पण पाच वर्षाच्या कालावधीत काय ‘उद्योग’ केले, याबद्दल माहिती उघड केली जात नाही.
Full story

मुलींच्या शिक्षणमार्गातील अडसर

शाळांमधील मुलींचा हा प्रश्न त्याचाच एक भाग. शाळांमधील स्वच्छतागृहं अत्यंत अस्वच्छ असल्यानं विद्यार्थी विशेषत: मुली तिथं जाणं शक्यतो टाळतात. त्यामुळं त्यांना पोटदुखी, किडनी स्टोन, युरीन इन्फेक्शनसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. शाळांमधील मुली या पौगंडावस्थेतली असल्यानं मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छतागृहात जाण्याची वेळ येत असल्यानं तर त्या शाळेत जाण्याचंच टाळतात....
Full story

परिसंस्थाच धोक्यात

निसर्गाची संपूर्ण परिसंस्था असलेल्या पाणथळ जमिनींवर भराव टाकून त्यावर गृहनिर्माण संस्था आणि कॉपरेरेट उद्योग उभे राहात आहेत. काही पर्यावरणप्रेमी सोडता बाकी कुणालाच याचे काही सोयरसुतक नाही. पण नष्ट होणा-या पाणथळींबरोबरच आपण निसर्गाचा समतोलही नष्ट करतोय, याचे भान कधी येणार?...
Full story

बेलगाम जाहिराती, नुकसान ग्राहकांचे करिती!

जाहिरातदार आणि ग्राहक यांचे नाते कोणते? असा प्रश्न जर विचारला, तर उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल. शिवाय या प्रश्नाचे एक ठाम उत्तर मिळणे ही कठीण होईल. पण आता वेळ आली आहे, भुलवणा-या जाहिरातींपासून तमाम ग्राहक वर्गाचे रक्षण करण्याची. असे केवळ ग्राहक हितार्थ झटणा-या संस्थांनाच वाटत नसून साक्षात ‘उपभोक्त मामले’ (कंझ्युमर अफेअर्स) मंत्रालयाला सुद्धा हालचाल करावी असे वाटू लागले आहे....
Full story

बॉम्बस्फोटाचा तपास राजकारणात अडकला

राजकारण हे केवळ राजकीय नेतेच करतात अशातला भाग नाही. पोलिस अधिकारीही चांगल्या प्रकारे ‘गेम’ करू शकतात, याचे हे ताजे आणि उत्तम उदाहरण. पण उच्चपदावरील जबाबदार व्यक्तीनेच तपास यंत्रणेतील भांडाफोड केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Full story

कामगारांचा लढा सुरूच..

गिरणी कामगार वगळता सध्या शहरात अन्य कामगारांचे मोठ-मोठे मोर्चे दिसत नाही. स्फूर्तीने भरलेल्या कामगारांच्या घोषणा कानावर पडत नाही. पण आजही कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. संघटित होण्याची धडपड करत आहेत. मात्र, कामगार संघटनांकडून त्यांना बळ मिळत नाही. त्यामुळे कारखान्यात मालकांचे मनमानी धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीतही अनेक कामगारांनी आपल्या हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला आहे. ...
Full story

जबाबदारी जामीन राहणा-याची

मार्च 1990 मध्ये आठ हजार रुपयांचे कर्ज रविकुमारने घेतले. ते 54 हप्त्यांमध्ये, द. म. 150 रुपये याप्रमाणे फेडायचे होते. 20 वर्षापूर्वी आठ हजार ही रक्कम ग्रामीण बँकेच्या खातेदारासाठी महत्त्वाची होती. ...
Full story

‘गोडसेने गांधींची हत्या का केली?’

गोडसेने गांधींची हत्या का केली, याचे उत्तर त्या अधिका-याने काय द्यावे? अधिकारीही धुतल्या तांदळाचे आहेत, अशातला भाग नाही. पण काही अर्जदारही कमालीचे उचापती असल्याचे दिसून येते....
Full story

उमलणा-या कळ्यांसाठी..

मुलींच्या भवितव्याचा विचार करताना तीन मुद्दय़ांच्या अनुषंगाने करावा लागतो. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन. एकूण जगण्याच्या प्रवाहात स्त्री-पुरुष असमानता नष्ट करण्यासाठी आणि स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. उमलणा-या कळ्यांचे भवितव्य सुरक्षित आणि उज्जवल बनवण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने या तीन बाबींच्या अनुषंगानेच पुढील पावले टाकावी लागतील.....
Full story

तरुण ग्राहक आणि आर्थिक नियोजन

आपल्या देशाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे युवा शक्ती. या युवक-युवतींना अर्थाजर्नाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. ...
Full story