बोच-या थंडीमुळे मुंबईकर काकडले
जानेवारीत 10 अंश सेल्सिअस तापमानाचा रेकॉर्ड केल्यानंतर मुंबईतून गायब झालेल्या थंडीने पुनरागमन करत पुन्हा एकदा पारा 8.8 अंश सेल्सिअस इतका खाली उतरला आहे.
उत्तर भारतात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे राज्यभर थंडीची लाट पसरली आहे. गुरुवारी पहाटे सांताक्रुझ वेधशाळेने किमान 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली, तर कुलाबा वेधशाळेत 14.2 अंश किमान तापमानाची नोंद केली. मुंबईत नोंदवले गेलेले हे दहा वर्षांतील दुस-या क्रमांकाचे किमान तापमान आहे. आठ फेब्रुवारी 2008 रोजी मुंबईत 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
मुंबईसह कोकण किनारपट्टीत हवेच्या दाबात फरक पडल्याने ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत मच्छीमारांनी सुमद्रात जाऊ नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. वा-याचा वेग वाढला असला तरी चक्रीवादळासारख्या आपत्तींचा धोका मुंबईकरांना नसल्याचा दावा कुलाबा वेधशाळेतील अधिका-यांनी केला आहे. थंडीमुळे धुके दाटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.नाशिक गारठले
कडाक्याच्या थंडीने नाशिक जिल्हा गारठला असून निफाडमध्ये तापमान शून्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी द्राक्षांच्या बागेत दवबिंदू गोठले होते. राहुरी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्रातील वेधशाळेत 0.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती संस्थेचे निरीक्षक राजेंद्र बेलदार यांनी दिली. या थंडीमुळे गहू व द्राक्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात जळगाव (10), अहमदनगर (12), नाशिक (2.7), पुणे (4.6), शहादा (4.4) येथे कमी तापमानाची नोंद झाली.
देशही थंडीने गारठला...





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा