महामुंबई
लोअर परळमध्ये आग
लोअर परळ येथील बावला मशिदीजवळ असलेल्या इराणी चाळीतील एका खोलीला शुक्रवारी सकाळी आग लागली.
ओंबळे, सोळंकीचा मारेकरी कसाबच
गिरगाव चौपाटीवर पोलिसांशी झालेल्या झटापटीदरम्यान अजमल कसाबने त्याच्याकडील रायफलीतून गोळ्या झाडून सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे यांची हत्या केली आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांना जखमी केले, याचे ठोस पुरावे न्यायालयात दाखल झाले आहेत....कल्याण उपकेंद्राबाबत विद्यापीठ उदासीनच
हातातोंडाशी आलेला घास गिळण्याचे सौजन्यदेखील न दाखवण्याचा चंग जणू मुंबई विद्यापीठाने बांधला असल्याचे कल्याण उपकेंद्राबाबतच्याघटनेवरून दिसून येत आहे....गुंडांकडून ग्रामस्थांच्या दुकानांची मोडतोड
तहसीलदारांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही ‘इनक्रॉप’ कंपनीच्या व्यवस्थापनाने काम सुरू ठेवल्याने संतप्त ग्रामस्थांनी कंपनीचे काम बंद पाडले. त्यानंतर कंपनीच्या गुंडांनी ग्रामस्थांची दुकाने जाळली....वाहनतळांच्या कंत्राटांत बचतगटांना आरक्षण
महापालिकेच्या सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) कंत्राटांमध्ये 50 टक्के राखीव जागा महिला बचत गट व महिला संस्थांना देण्याचा निर्णय गुरुवारी महापालिका प्रशासनाने महापौर श्रद्धा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला. ...बेस्टच्या वीज ग्राहकांना खुशखबर
चहूबाजूंनी महागाईच्या लाथाबुक्क्या पडत असताना बेस्टने आपल्या वीज ग्राहकांसाठी मात्र खुशखबर आणली आहे. वीज वितरण कंपन्या विविध आकारांच्या नावाखाली सातत्याने दरवाढ पदरात पाडून घेत असताना बेस्टने मात्र 2010-11 या आर्थिक वर्षासाठी दरवाढ नको असल्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. ...गुढ्यातोरणे सण उत्साहाचा
गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा असं एक समीकरण गेल्या काही वर्षात डोंबिवली ते दादर, गिरगाव, बोरिवली अशा मराठमोळ्या भागांत रूढ झालं आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांची, आपल्याच वारशाची आजच्या पिढीला ओळख करून देणं, हा या स्वागतयात्रांमागील एक उद्देश. हा मराठी बाणा नाही तर इथल्या मातीशी जुळलेल्या मराठी मनांनी स्वत:लाच घातलेली एक साद आहे. डोंबिवलीकरांनी या स्वागतयात्रेची गुढी पहिल्यांदा उभारली. डोंबिवलीकरांसाठी यंदा स्वागतयात्रेची तपपूर्ती आहे. यानिमित्ताने डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, ठाणे अशा विविध ठिकाणी निघणा-या उत्सवी स्वागतयात्रांची ही माहिती ...छोटा पांडे सीबीआयच्या हवाली
पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील एका संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीबीआयच्या हवाली करण्यात आला आहे....पालिकेतील सत्ताधा-यांचाच पाणीचोरीत हात
ज्यांच्यावर पाणीचोरी रोखण्याची जबाबदारी आहे त्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे शाखाप्रमुखच पाणीचोरी करीत आहेत. याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत बुधवारी केला....‘26/11’ हल्ला म्हणजे भारताविरुद्धचे छुपे युद्धच!
पाकिस्तानचा जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांनी मुंबईवर केलेला ‘२६ नोव्हेंबर’चा हल्ला म्हणजे भारताविरुद्ध छुपे युद्धच होते. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ अन्वये देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या गंभीर आरोपाखाली त्यांना शिक्षा व्हायला हवी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला....मोस्ट कमेंटेड



‘मास्को’ द ड्रामा