PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नैमित्तिक प्रभाग क्रमांक- 107 घाणीमुळे डासांचे साम्राज्य ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 October, 2010 08:15:00 AM सुनीलनगर प्रभागात जागोजागी पडलेला कचरा, घाण त्यामुळे परिसर बकाल झाला आहे. डासांचे साम्राज्यही दिवसेंदिवस वाढत असून रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रभाग क्रमांक-106 कच-यामुळे दुर्गंधीची समस्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 October, 2010 08:05:00 AM संगीता वाडी प्रभागातील अनेक इमारतींमधील रहिवाशांना रोजच पाण्यासाठी वणवण करावी लागते. दिवसातून एकदाच रात्रीच्या वेळेस पाणी येत असून तेही कमी दाबाने येते. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रभाग क्रमांक- 101 पिण्याच्या पाण्यासाठी वणवण ================================================================================ राजू टपाल on 21 October, 2010 07:55:00 AM गोग्रासवाडी या प्रभागतील अनेक इमारतींमध्ये पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रभाग-77-अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांची भीती ================================================================================ राजू टपाल on 20 October, 2010 05:20:00 AM रस्त्यांवर कुठेही गतिरोधक नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यांच्या कडेला सर्रास वाहने उभी केल्यामुळे गणेश चौक, सुदाम भोईर चौक परिसरांत वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच असते. बहुतांश रस्त्यांना गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव जात असतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. यावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. प्रभाग-65- निधीअभावी उद्यान रखडले ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 October, 2010 05:15:00 AM राजूनगर परिसरात मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान वा उद्यान नाही. आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर उद्यानाचे काम सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी अनेक वेळा केली परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. निधी उपलब्ध झाला नसला तरी स्वखर्चातून उद्यान बांधण्याची ग्वाही नगरसेवकांनी दिली आहे. मात्र त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा परिसर सध्या उद्यानाविनाच असल्याने मुलांमध्ये नाराजीचा सूर आहे प्रभाग क्र. 72 - ठाकूरवाडीत स्वागतच दुर्गंधीने ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 October, 2010 05:05:00 AM ठाकूरवाडी परिसरातील रहिवाशांनी अनेक समस्यांचा पाढाच वाचला. प्रभागातील नाला पावसाळय़ात तुडुंब भरतो. त्याला संरक्षक भिंती नसल्याने सांडपाणी रहिवाशांच्या घरात शिरते. त्यामुळे अतिशय बिकट अवस्था होते. लहान मुलांचे तर अक्षरश: हाल होतात. नाल्यालगत भिंती बांधण्यासाठी रहिवाशांनी अनेक वेळा नगरसेवकाकडे तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. प्रभाग-71-चालणेही झाले कठीण ================================================================================ श्रुती देशपांडे on 20 October, 2010 04:55:00 AM जुनी डोंबिवली परिसरातील धनाजी वाडी, दत्तगुरू चाळ या ठिकाणी मलनि:सारणाची व्यवस्थाच नसल्याने सांडपाणी घरासमोरूनच वाहत असते. त्यामुळे संपूर्ण परिसरातच दुर्गंधी पसरलेली असते. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी तयार झाल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. डासांचे प्रमाणही वाढल्याने साथीच्या आजारांना निमंत्रणच मिळते. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिले नाही... प्रभाग-57- खडकाळ रस्ते आणि तुडुंब गटारे ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 October, 2010 04:35:00 AM मुख्य रस्त्यावरील गटारांची साफसफाई केली जात नसल्याने गटारे घाण व कच-यांनी भरलेली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणा-या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पाणी समस्याही येथे ठाण मांडून आहे. प्रभाग95-उघडे मॅनहोल, गाडय़ा पार्किंग,वाहतुकीची समस्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 October, 2010 03:55:00 AM टिळकनगर प्रभागास सरकारने ‘आयएसो’ प्रमाणपत्र दिले आहे. मात्र येथे अनेक समस्या कायम आहेत. येथील काही फुटपाथ बांधून झाले तरी त्यावर लाद्या बसवण्यात आलेल्या नाहीत. तसेच येथील मॅनहोल हे कायम उघडेच आहेत. तसेच अनेक वेळा पथदिवेही चालू नसतात त्यामुळे अंधार पसरून येथे अनेक अपघात घडलेले आहेत. प्रभाग क्र. 98- इंदिरानगरमध्ये विकासाची बोंब ================================================================================ श्रुती देशपांडे on 19 October, 2010 05:25:00 AM इंदिरानगर हा संपूर्ण झोपडपट्टी परिसर आहे. आधीपासूनच तो अविकसित आहे. जलवाहिनी, गटारे, रस्त्यांचे डांबरीकरण ही मूलभूत कामेही येथे झालेली नाहीत. शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. पथदिवे असूनही ते बिघडलेले आहेत. त्यामुळे वाहनाचालकांची गैरसोय होते. याबाबत रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.