पहिले पान | देश | अडीच कोटी टन धान्य गरीबांच्या झोळीत

अडीच कोटी टन धान्य गरीबांच्या झोळीत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर अखेर दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी अडीच कोटी टन अतिरिक्त धान्य खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर अखेर दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी अडीच कोटी टन अतिरिक्त धान्य खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. मात्र हे धान्य मोफत नव्हे, दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मिळते, त्याच दराने असा पवित्रा सरकारने घेतला आहे.

 गरिबांना मोफत धान्य देण्यासंदर्भात सल्ला नव्हे आदेशच होता, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ही माहिती दिली. ‘‘देशातील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा आढावा सरकार घेते आहे. दारिद्रय़रेषेखालील लाभार्थीची संख्या या आढाव्यानंतर वाढणे अपेक्षित आहे. वाढीव संख्येनुसार अन्न-धान्य वितरणाचा कोटा निश्चित होईल. तोपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून हे अडीच कोटी धान्य खुले केले,’’ असेही ते म्हणाले.? 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0