पहिले पान | देश | गुजरात हायकोर्टाची मोदी सरकारला चपराक

गुजरात हायकोर्टाची मोदी सरकारला चपराक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगली रोखण्यासाठी गुजरात सरकारने योग्य पावले उचलली नाहीत असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला,

अहमदाबाद- गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगली रोखण्यासाठी गुजरात सरकारने योग्य पावले उचलली नसल्याचा ठपका अहमदाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी ठेवला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मोदी सरकारला चांगलीच चपराक बसली आहे. 

लोकायुक्तांच्या नियुक्तीनंतर  गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा  मोदी सरकारला कडक शब्दांत फटकारले. गुजरात दंगलीबाबत गुजरातच्या इस्लामिक रिलीफ कमिटीने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य आणि न्यायाधीश पार्दीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारने दंगली रोखण्यासाठी कृती केली नाही, शिवाय त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याचे न्यायालयाने सांगितले.

गोध्रा हत्याकांडानंतर  उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये राज्यातील  धार्मिक स्थळांचेही रक्षण करण्यात असमर्थ ठरले. सरकारच्या या बेर्पवाईमुळे राज्यातील जवळपास 500 धार्मिक स्थळांचे नुकसान झाले. घरांसाठी किंवा व्यापारी संस्थांसाठी नुकसान भरपाई देण्यात येत असेल, तर धार्मिकस्थळांसाठी पण देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने या सुनावणीवेळी दिला आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0