PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स नायिकेच्या शोधात ================================================================================ राजेश शिरभाते on 19 May, 2012 07:45:00 AM संजय दत्तचं आयुष्य इतकं वादळी आहे की, त्यापुढे हिंदी चित्रपटांमधली वळणंही अपुरी वाटावीत. आपलं अख्खं आयुष्यच एखाद्या चित्रपटासारखा जगलेला हा अभिनेता ठराविक अंतराने स्वत:ला नव्याने शोधत असतो. संजय दत्त आता संपला असं वाटत असतानाच तो मुसंडी मारून वर येतो. आयुष्यात अनेक कटू अनुभव येऊनही त्याची जिंदादिली अजून कमी झालेली नाही. आपल्या पूर्वायुष्याविषयी कोणत्याही प्रकारची खंत व्यक्त न करणारा, कोणत्याही दु:खाचं प्रदर्शन न मांडणारा संजय दत्त अगदी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारतो. ‘नाम’, ‘साजन’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या त्याच्या चित्रपटांनी त्या त्या वेळी त्याची करिअरची डुबती नय्या सावरली होती. आता ‘डिपार्टमेंट’सह तो पुन्हा एकदा नवी खेळी खेळण्यासाठी सज्ज झालाय. या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा.. बिहारी गाण्यांचा मराठी ढंग ================================================================================ प्रहार on 19 May, 2012 07:35:00 AM अनुराग कश्यप हा पठ्ठ्या आज एकाच वेळी तब्बल 11 चित्रपटांची निर्मिती करतोय. त्यात जर्मनीतला सिनेमा आहे, ब्राझिलचा सिनेमा आहे. अलिकडेच मायकल विंटरबॉटमच्या ‘तृष्णा’चाही तो सहनिर्माता होता. नॉट सो इडियट बॉक्स ================================================================================ प्रहार on 19 May, 2012 05:15:00 AM यंदाच्या नॉट सो इडियट बॉक्समध्ये पहावेत असे काही चित्रपट आणि कार्यक्रम... स्टार नव्हे, मेकरचा सिनेमा ================================================================================ प्रहार on 19 May, 2012 07:15:00 AM भारतात चित्रपट हा स्टारच्या नावाने ओळखला जातो. आपल्याला चित्रपट तारे-तारकांचं ओंगळवाणं म्हणावं इतकं आकर्षण आहे. त्यामुळे चित्रपटाचा कर्ताधर्ता हा नायकच असतो, अशी प्रेक्षकांची समजूत असते. नवथर, उत्कट, निरागस ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 19 May, 2012 07:05:00 AM ‘करीब’ या फारसा गाजावाजा न झालेल्या चित्रपटातले 'चोरी चोरी जब नजरें मिली चोरी चोरी जब निंदे उडी' हे गीत अतिशय नेत्रसुखद व कर्णधुर आहे. जनाब राहत इंदोरी हे ऊर्दू मुशाय-यातले वलयांकित नाव. रुपेरी पडदा मात्र त्यांना फारसा वश झाला नाही; पण त्यांच्या लेखणीची जादू समजायला ‘करीब’मधली गाणी पुरेशी आहेत. हिंदीची दारं उघडली ================================================================================ गुरू ठाकूर on 19 May, 2012 04:15:00 AM गुरु ठाकूर सध्या दोन हिंदी चित्रपटांच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये गुंतला आहे. या संदर्भात त्याच्याशी केलेली बातचीत... ‘कॉमन मॅन’चं प्रतिनिधित्व करणारा ‘भारतीय’ ================================================================================ संदीप नलावडे on 19 May, 2012 04:15:00 AM ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ असं आपण प्रतिज्ञेत म्हणतो. पण आपण ‘भारतीय’ आहोत, म्हणजे नेमकं काय? आपलं ‘भारतीय’ असणं म्हणजे काय?.. या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न ‘देविषा फिल्म्स’च्या ‘भारतीय’ या आगामी चित्रपटातून करण्यात येणार आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या कोल्हापूर परिसरात वेगाने सुरू आहे. गिरणगावी अवघे नाटक नाटक! ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 19 May, 2012 05:25:00 AM गेल्या ‘समांतरीय’मध्ये (पाच मे 2012) कामगार रंगभूमीचा प्रेरणास्त्रोत असलेल्या राजकीय कलापथकांचे कार्यक्रम व मेळे यांचा परामर्श घेतला होता. या लेखात कामगार रंगभूमीवरील संपूर्ण तीन अंकी नाटकांचा आणि त्यातील विविध प्रकारांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्व नाट्यस्मृतींचे हे एक धावते दर्शन आहे. बर्गमन, बॉये यांच्या जुगलबंदीनं रंगलेलं चित्तथरारक संदेहविलसित ================================================================================ यशवंत रांजणकर on 19 May, 2012 05:45:00 AM निर्माता डेव्हिड ओ सेल्झनिक हॉलिवुडमधल्या इतर स्टुडिओंकडून इंग्रिड बर्गमनसाठी येणा-या ऑफर्सचा विचार करत होता. ती त्यावेळी त्याच्या कंपनीशी दीर्घ काळासाठी पगारी कलाकार म्हणून करारबद्ध होती. पुन्हा करिश्मा ================================================================================ राजेश शिरभाते on 12 May, 2012 04:30:00 AM राज कपूरची नात अशी ओळख घेऊन ती सिनेमासृष्टीत आली. कपूर घराण्यातली सिनेमात आलेली पहिली मुलगी म्हणून तिच्याकडे मोठ्या आदरानं पाहिलं गेलं. आपल्या अनेक सिनेमांमधून तिने ही अपेक्षा पूर्णही केली. गोविंदाबरोबरच्या काही सिनेमांमुळे तिच्यावर टीकाही झाली. या टीकेला तिने ‘राजा हिंदुस्थानी’ व ‘दिल तो पागल है’सारख्या चित्रपटांतून चोख उत्तर दिलं. लग्नानंतर तिने सिनेमासृष्टीला राम राम केला. जाता जाता ‘सहारा’ चॅनेलवर एक बिग बजेट मालिका तिने केली, मात्र छोट्या पडद्यानं तिला स्वीकारलं नाही. आता तब्बल अकरा वर्षानंतर ती पुन्हा सिनेमात येतेय. ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटातल्या एका वेगळ्या भूमिकेतून ती प्रेक्षकांसमोर येत आहे. करिष्माची ही इनिंग कशी होईल, याविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा.