पराभवासाठी आयपीएल जबाबदार नाही
भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील हाराकिरी ही इंडियन प्रिमीयर लीगमुळे (आयपीएल) नाही तर भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अयोग्य नियोजनामुळे होत असल्याचे मत माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
मुंबई- भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील हाराकिरी ही इंडियन प्रिमीयर लीगमुळे (आयपीएल) नाही तर भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अयोग्य नियोजनामुळे होत असल्याचे मत माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भारतीय संघाची परदेशातील अपयशाची मालिका चालूच असल्याने संघाच्या या कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार मानन्यात येत आहे. मात्र माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे व बापू नाडकर्णी यांच्यासह आता माजी कर्णधार वेंगसरकर यांनीही संघाच्या सध्याच्या कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार धरलेले नाही.
" दौ-यापूर्वी अजून काही सामने खेळणे आवश्यक होते. खेळाडूंचा पुरेसा सरावही झालेला नाही. याशिवाय संघातील रोहित शर्मा, वृद्धिमन सहा हे राखीव खेळाडू शेवटच्या कसोटीत खेळण्याची शक्यता असली तरी ते महिन्याहून अधिक काळ एकही सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे सध्याच्या कामगिरीसाठी फक्त आयपीएललाच जबाबदार धरणे योग्य नाही" असे, वेंगसरकर म्हणाले.
युवा खेळाडू, प्रथम श्रेणी क्रिकेट याशिवाय अ संघाबाबतही योग्य नियोजनाची गरज असल्याचेही वेंगसरकर यांनी नमूद केले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा