देशात दर्जेदार फिरकीपटूंची वानवा- लक्ष्मण
सध्या संघातून खेळणारे फिरकी गोलंदाज सोडले तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्जेदार फिरकी गोलंदाज दिसून येत नाही, असे मत शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली- भारताकडे सध्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांची कमतरता असल्याचे मत शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. सध्या संघातून खेळणारे फिरकी गोलंदाज सोडले तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्जेदार फिरकी गोलंदाज दिसून येत नाही, असे लक्ष्मण क्रिकइन्फोच्या व्हिडिओ शोदरम्यान म्हणाला.
सध्या खेळणारे फिरकी गोलंदाज निवृत्त झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांचा अभाव ही भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता लक्ष्मण याने व्यक्त केली. देशांतर्गत क्रिकेट खेळणा-या फिरकी गोलंदाजांची कामगिरी निश्चितच समाधानकारक नाही, असे तो म्हणाला.
फलंदाजीच्या बाबत मात्र उलट परिस्थिती असल्याचे लक्ष्मणने नमूद केले. सध्याची फळी निवृत्त झाली तरी काळजीचे कारण नाही. गुणवान फलंदाजांची नवीन फळी अगोदरपासून तयार आहे, असे त्याने नमूद केले. सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्याचप्रमाणे अंबाती रायडूमध्येही भारतीय फलंदाजीचा कणा बनण्याचे गुण आहेत, असे लक्ष्मण म्हणाला.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा