पहिले पान | क्रीडाजगत | राजस्थानने रणजी चषक पटकावला

राजस्थानने रणजी चषक पटकावला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

तामिळनाडूवर पहिल्या डावात मिळवलेली आघाडी कायम ठेवत राजस्थान क्रिकेट संघाने सलग दुस-यांदा रणजी चषक पटकावण्याची किमया साधली.

चेन्नई- तामिळनाडूवर पहिल्या डावात मिळवलेली आघाडी पाचव्या दिवशीही कायम ठेवत राजस्थान क्रिकेट संघाने सलग दुस-यांदा रणजी चषक पटकावण्याची किमया साधली आहे. विजेत्या राजस्थान संघाला दोन कोटी रुपये तर उपविजेत्या तामिळनाडूला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. राजस्थानचा कर्णधार ऋषीकेश कानिटकरच्या नेतृत्वाखालीच राजस्थानने सलग दोन वेळा चषक पटकावला.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानने पहिल्या डावात तामिळनाडूवर  329 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. यानंतर सोमवारी तामिळनाडूला फॉलोऑन न देता राजस्थानने फलंदाजी करुन दुस-या डाव 204 धावांवर घोषित केला. राजस्थानच्या या विशाल धावांसमोर तामिळनाडूला सोमवारी काही औपचारीक षटके खेळणे बंधनकारक होते. अवघ्या 13 षटकांच्या झालेल्या खेळात तामिळनाडूच्या दोन बाद आठ धावा केल्या.

यानंतर दोन्ही कर्णधारांनी मिळून सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राजस्थानने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी करंडकावर आपले नाव कोरले. राजस्थानकडून पहिल्या डावात 257 धावांची खेळी करणा-या विनित सक्सेनाला सामनावीर घोषित करण्यात  आले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0