05 April, 2011 08:10:00 PM
वर्ल्डकप जिंकणा-या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव अद्याप चालूच असून राजधानीतील आम्रपाली बांधकाम कंपनीने संघातील सर्व क्रिकेटपटूंना बंगले देण्याची घोषणा केली आहे.
05 April, 2011 06:40:00 PM
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होण्याची सुवर्णसंधी आपण गमावली, अशी खंत वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने मंगळवारी व्यक्त केली....
05 April, 2011 03:30:00 PM
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची तीन वर्षे आयुष्यातील संस्मरणीय असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मंगळवारी व्यक्त केले....
04 April, 2011 07:00:00 PM
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील 97 धावांची खेळी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण होती, अशी भावना भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज गौतम गंभीर याने सोमवारी व्यक्त केली. ...
04 April, 2011 03:50:00 PM
'माझ्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील महेंद्रसिंग ढोणी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे' असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ढोणीचे जाहीर कौतुक केले. ...
04 April, 2011 11:08:00 AM
श्रीलंकेला 274 धावा करू दिल्या म्हणून त्या मधल्या इंटर्वलमध्ये भारतीय संघाला शिव्या देणारे लाखो होते. प्रत्यक्षात त्या सुरेख खेळपट्टीवर श्रीलंकेला 300 धावा करता आल्या नाहीत, याबद्दल युवराज, रैना, कोहली यांचे आभार मानले पाहिजेत. झहीर, श्रीशांत हेही डीप फील्डमध्ये ब-यापैकी सावध होते. तीच गोष्ट 30 यार्ड वर्तुळात सचिन, हरभजन यांची. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांमध्ये, पाकिस्तानला 229 धावांमध्ये आणि श्रीलंकेला 274 धावांमध्ये रोखलं. प्रत्येक सामन्यात एरवी भारतानंच 20-30धावा अधिक दिल्या असत्या, तरी कोणी काही बोललं नसतं. पण असा ढिसाळपणा परवडणार नाही हे भारतीय संघाला वेळीच उमगलं. पाकिस्ताननं त्यांचा वर्ल्डकप ‘ड्रॉप’ केला. भारतानं ते होऊ दिलं नाही.
...
03 April, 2011 07:50:00 PM
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने दिली. ...
03 April, 2011 06:25:00 PM
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून संघाला अजिंक्यपद मिळवून देणारे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि झहीर खान यांचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक संघात झाला आहे. ...
03 April, 2011 04:45:00 PM
गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर भारताने उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय हा वर्ल्डकप स्पर्धेतील टर्निंग पॉइंट ठरला, असे मत भारताचा कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने रविवारी व्यक्त केले....
03 April, 2011 03:45:00 PM
वर्ल्डकप जिंकायचाच हे लक्ष्य ठेवत त्यानुसार आखलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने सामन्यानंतर व्यक्त केली....