केंद्रीय अर्थसंकल्प
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाही
18 March, 2012 10:50:00 AM
ज्येष्ठ नागरिकांना या अर्थसंकल्पाने निराश केले आहे. या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारच्या ठोस सुविधा ज्येष्ठांना देण्यात आलेल्या नाहीत. - मधुकर कुलकर्णी, उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघाचा महासंघ
माहिती व प्रसारण खात्यासाठी भरीव तरतूद
17 March, 2012 12:43:00 PM अर्थसंकल्पामध्ये माहिती व प्रसारण खात्यासाठी पाच टक्के वाढीसह 2737.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 2604 कोटी रुपयांची तरतूद होती. ...सर्वसाधारण अर्थसंकल्प
18 March, 2012 01:55:00 PM अर्थसंकल्प कोणालाच खूश करणारा नाही, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे. कॉपरेरेट व मध्यमवर्गाला मिळणा-या सवलतींना काहीसा लगाम बसला आहे.- सुरेश सावंत, समाज सेवक...पर्यावरणाबाबत उदासीनता
18 March, 2012 02:05:00 PM अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पर्यावरणाच्या धोरणांना घातक आहे. या अर्थसंकल्पात पर्यावरण, वनसंवर्धन, वन्यजीव, निसर्ग, प्रदूषण नियंत्रण याबाबत कुठल्याही प्रकारचे भाष्य नाही तसेच तरतुदीही नाहीत.- देबी गोयंका, पर्यावरणतज्ज्ञ...संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद कमीच
18 March, 2012 11:45:00 AM संरक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली वाढ 17 टक्के आहे. ही वाढ 30 टक्के अपेक्षित होती पण केलेली वाढ स्वागतार्ह आणि चांगली आहे. सध्याचे केंद्र सरकार या क्षेत्राबद्दल सकारात्मक विचार करत आहे हे यावरून दिसते. - डी.बी. शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल...निधी आहे, कामांची गुणवत्ता हवी
18 March, 2012 04:50:00 PM पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी 14 हजार कोटींची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. विकास प्रक्रियेला पैशांची उपलब्धता हा विषय आता राहिलेला नाही. तरतूद प्रचंड मोठी आहे, परंतु त्या तुलनेत गुणवत्ता महत्त्वाची आहे. - पोपटराव पवार, सरपंच, हिवरे बाजार...शेतक-यांसाठीच्या घोषणा फसव्या
18 March, 2012 12:10:00 PM केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतक-यांसाठी निराशाजनक असून, विदर्भात 300 कोटी रुपयांची तरतूद म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा देऊन गेला. - विजय जावंधिया, नेते, शेतकरी संघटना...अर्थसंकल्पात शिक्षणाची दुरवस्था
18 March, 2012 10:20:00 AM माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी सहा हजार नवीन मॉडेल स्कूल स्थापन केले जातील व त्यासाठी तीन हजार 124 कोटी एवढा निधी 2012-13 या आर्थिक वर्षात दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. - प्रा.द.ना.धनागरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ...हवामान बदलासाठी योग्य तरतूद
18 March, 2012 02:40:00 PM हवामान बदलासाठी खास निधीची तरतूद करणे हे यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. पहिल्यांदाच अशी तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे. याचा निश्चितच फायदा देशासाठी होईल, अशी आशा आहे.- प्रमोद काळे, माजी संचालक विक्रम साराभाई अवकाश केंद्र, इस्त्रो...कौशल्य विकासाला संधी
18 March, 2012 02:25:00 PM शिक्षणामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे मानवी भांडवल निर्माण करणे. भारत सरकारच्या 2012-13 अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक खर्चाच्या बाबतीत ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्या लक्षात घेता, सध्याचा अर्थसंकल्प आर्थिक विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व मानणारा आहे, असे दिसते.- प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ...मोस्ट कमेंटेड














































































































राशीभविष्य