तुम्ही नाश्त्यामध्ये चहा-चपाती खाता का? तर हे जरूर वाचा नाहीतर...

मुंबई: अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा-चपाती खाल्ली जाते. हा एक प्रकारचा पोटभरीचा नाश्ता मानला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का हा पोटभरीचा पदार्थ तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करत असतो. चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी जरी चांगले असले तरी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.



वाढू शकते अॅसिडिटी


आरोग्य तज्ञांच्या मते गरम पेय पदार्थासोबत चपाती हे एक खराब कॉम्बिनेशन आहे. चपातीसोबत चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारण कॅफेनयुक्त चहा अथवा कॉफी तुमच्या पोटात अॅसिड बेस संतुलन बिघवते. यामुळे चपाती अथवा पराठा हे जड पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडू शकते.



अॅनिमियाची भीती


चहामधील फेनोलिक केमिकल्स पोटातील आर्यन-कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेशनला स्टिम्युलेट करतात. यामुळे शरीरात आर्यन शोषण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये. ज्या लोकांना आर्यनची कमतरता आहे त्यांनी खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये.



चहा-चपाती नुकसानकारक


चहामध्ये आढळणारे टॅनिन प्रोटीनसोबत मिळून अँटीन्यूट्रिएंट्सप्रमाणे काम करतात. एका अभ्यासानुसार टॅनिन या प्रोटीनला ३८ टक्क्यांपर्यंत कमी करतात. अशातच चहासोबत चपाती अथवा पराठा खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून चहा प्या. कोणत्याही प्रकारचे भोजन केल्यानंतर कमीत कमी ४५ मिनिटांनी चहा प्या. नाश्ता अथवा दुपारचे जेवण केल्यानंतर १ तासांनी अथवा संध्याकाळी स्नॅक्ससोबत तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकता.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे