आधी स्वत:च्या अस्तित्वाबद्दल विचार करा, मग आमच्यावर बोला

आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


मुंबई : भाजपाला ४०० पार होऊ देणार नाही, हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रथम विचार करावा आणि मगच आमच्यावर बोलावे, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.


नितेश राणे म्हणाले की, मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीने महत्त्वाची माहिती दिलेली आहे की, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. ही अर्धीच बातमी असून त्याचा पुढील टप्पा म्हणजे केवळ शरद पवार गट नाही, तर उबाठा गट हा ही काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशी चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. जेणेकरून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे आणि पवार गटाचे सर्व उमेदवार हे काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढतील, अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झाली आहे.


पुढे नितेश राणे म्हणाले की, स्वाभिमान पक्ष आम्ही काढला होता तेव्हा आम्ही दोन निवडणूक लढलो होतो. एक कणकवली नगर पंचायत आणि दुसरी लोकसभेची निवडणूक लढलो. कणकवली नगर पंचायत निवडणुकीसाठी आम्हाला कप बशी चिन्ह दिले होते. तर लोकसभेसाठी फ्रीज हे चिन्ह दिले गेले होते. याचा अर्थ असा होतो की, मशाल चिन्ह हे उबाठा गटाला अंधेरी पोटनिवडणुकीपुरते मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांना वेगळे चिन्ह निवडावे लागेल. तशीच अवस्था शरद पवार गटाची आहे. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने उद्धव ठाकरेंचा हात काँग्रेसच्या हातात, अशी परिस्थिती तयार झाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.


आदर्श घोटाळ्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळातही होता. तेव्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण वाईट वाटले नाहीत. मग आता आमच्याकडे चव्हाण आल्याने त्यांना भ्रष्टाचारी म्हणणे योग्य नसल्याचे आमदार राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Ganpati Visarjan : मुंबईत दीड दिवसांच्या 61,528 गणपतींचे विसर्जन; भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला मोठा प्रतिसाद मिळाला. 16 सप्टेंबर

 Cafe Mondegar : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन; कुलाब्यातील प्रसिद्ध कॅफे मोंडेगारचा परवाना निलंबित

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या

Ganeshotsav 2026 : ‘पुढच्या वर्षी लवकर या!’; मुंबईत 25 हजारांहून अधिक दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन मंगळवारी (15 सप्टेंबर) मोठ्या

Mumbai Municipal Corporation : कंत्राट कामांंचे पैसे रोखले, १३ कोटींच्या तुलनेत ६६ कोटी रुपये देण्याची आली वेळ

खाते गोठवण्याचा न्यायालयाच्या भीतीने प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने केला मंजूर महापालिकेच्या मलनि:सारण

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

फेरीवाल्यांसह अतिक्रमण मुक्त पदपथ मोहिमेला आणि अधिक बळकटी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने

Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

महिला बचत गटांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत