तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

मुंबई: आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात ज्यात सर्वाधिक वापर हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अनेकजण प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या बाटलीचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला याचे फायदे आणि नुकसान माहीत आहे का?



जाणून घ्या फायदे


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरसचे गण अधिक असतात जे रोगांपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. हृदयरोगापासून बचाव होतो. पचनक्रिया सुरळीत होते. सोबतच आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो.



जाणून घ्या नुकसान


तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र अनेकदा ही नीट स्वच्छ केली नाही तर उल्टी अथवा पोटाची समस्या जाणवते. गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जास्त वेळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू नका. ८ ते १२ तासच पाणी त्या बाटलीत ठेवा.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे