किरणसोबतच्या घटस्फोटानंतर तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर खान?

मुंबई: आमिर खान आपल्या सिनेमांसोबतच खाजगी जीवनासाठीही नेहमी चर्चेत राहतात. खाजगी आयुष्याबद्दल लोक आमिरला अनेक सवाल करतात. आमिर खानने २ लग्ने केली. त्याने पहिले लग्न रीना दत्ता हिच्याशी केले होते. १९८६मध्ये आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते.


त्यांचे हे लग्न १६ वर्षे टिकले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुले आयरा आणि जुनैद आहे. रीनानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले होते. किरण आणि आमिर यांना एक मुलगा आझाद आहे. काही वर्षांर्पूर्वी किरण आणि आमिर वेगळे झाले आहेत. रीना आणि किरणच्या या आयुष्यातून गेल्यानंतर आता प्रत्येकजण आमिरला विचारत आहे की तो तिसरे लग्न करणार का? यावर आमिरने मौन सोडले आहे.


किरण आणि आमिर यांनी २०२१मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. आता नुकतेच आमिर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये गेला होतो. तेथे त्याला पुन्हा लग्नाबाबत विचारण्यात आले.



तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर?


जेव्हा रियाने आमिरला तिसऱ्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, मी आता ५९ वर्षांचा झालो आहोत. मला नाही वाटत की मी पुन्हा लग्न करू शकेन. कठीण वाटत आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहे. माझी मुले, भाऊ, बहिणी आहेत. मी त्यांच्यांसोबत खुश आहे जे माझ्याजवळ आहेत. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.

Comments
Add Comment

Khajiri Che Bol Marathi Movie : हातात खंजिरी, मनात राष्ट्रभक्ती; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गाथा आता रुपेरी पडद्यावर!

मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अध्यात्म, संतपरंपरा आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित

Young DSA Bigg Boss 20 : गुल्लू आणि आसिफला मागे टाकत 'यंग डीएसए' ठरला ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन

मुंबई : ‘बिग बॉस सीझन 20’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये रंगतदार खेळ सुरू झाला आहे. तब्बल १६

Jodi Marathi Movie : ‘जिवा शिवाची बैल जोड...’; महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं बळीराजा-बैलांचं अतूट नातं लवकरच पडद्यावर!

मुंबई : 'जिवा शिवाची बैल जोड, लाविल पैजंला आपली कुडं...'चं महत्व सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं हे

Marathi Film Industry : मराठी चित्रपटांसाठी अधिक चित्रपटगृहे; रामटेक आणि नाशिकमध्ये नव्या फिल्म सिटीची तयारी

62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्‍न मुंबई : मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत

Drishyam 3 : अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत? 'दृश्यम ३' च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्याने सोडले मौन म्हणाला, मी अक्षय खन्नाची...

मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' (Drishyam 3) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अक्षय

Vandana Gupte News: वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या; म्हणाल्या, 'खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी...'

मुंबई: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चहात्यांच्या