सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' साठी सज्ज

मुंबई : सलमान खान त्याच्या नवीन चित्रपटासाठी जबरदस्त तयारी करत आहे. तो या चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. त्याने त्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे. ज्या चित्रपटासाठी तो अनेक महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहे तो म्हणजे बॅटल ऑफ गलवान. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत . हा चित्रपट गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे . या चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग असेल .


या चित्रपटासाठी सलमान खानने त्याच्या आहारातही बदल केला आहे. त्याने बरंच वजनही घटवलं आहे आणि त्याचबरोबर तो व्यायामही करतोय. असे म्हटले जात आहे की त्याने दारूही सोडली आहे. सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'साठी मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये एक सेट बांधला जात आहे.


सलमान खान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 'बॅटल ऑफ गलवान'चे शूटिंग सुरू करणार आहे. जे सध्या मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये होणार आहे. तिथली डिझाईन टीम आता सेट बनवत आहे. हा सेट या महिन्याच्या अखेरीस तयार होईल. तो १०-१२ दिवसांसाठी चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर संपूर्ण टीम लडाखला जाऊन चित्रपटाचे काम पूर्ण करेल. लडाखला जाण्यापूर्वी, अनेक पात्रांची सुरुवातीची दृश्य मुंबई येथे शूट केली जाणार आहेत.


अनेक अ‍ॅक्शन सीन्स लडाखमध्ये शूट केले जातील. लडाख मधील शूटिंग थोडे कठीण असणार आहे . त्यात लढाई प्रशिक्षण, रात्रीचे शूटिंग आणि मोठ्या प्रमाणात सिम्युलेटेड युद्ध दृश्ये असतील. यासाठी सलमानला शारीरिकदृष्ट्या अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे .

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या