‘गोविंदा फक्त माझा आहे’

गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गोविंदाच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना ‘गोविंदा फक्त माझाच आहे’ असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. या अर्जामध्ये ‘अत्याचार’ आणि ‘फसवणूक’ असे गंभीर आरोप केल्याचेही म्हटले जात होते. या अफवांवर दोघांनीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, यावर्षीच्या गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदा आणि सुनीता त्यांच्या मुलांसोबत एकत्र दिसले. दोघांनीही मीडियासमोर एकत्र फोटो काढले आणि एकमेकांबद्दलचे प्रेम दाखवले. यावेळी गोविंदानेही आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा मागितल्या. त्याने म्हटले, ‘बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यावर कुटुंबातील सर्व दु:ख दूर होतात. मला विशेषतः माझा मुलगा यश आणि मुलगी टीना यांच्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद द्यावा.’गोविंदा आणि सुनीता यांचा एकत्र फोटोमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या