'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कांतारा चित्रपटाप्रमाणेच कांतारा चॅप्टर १ हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. दरम्यान कांतारा चॅप्टर १ च्या प्रचारावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने दशावतार या मराठी चित्रपटाचे कौतुक केले.


दशावतार चित्रपटाबद्दल बोलताना रिषभ शेट्टी म्हणाला, "मी या चित्रपटाबाबत खूप ऐकले आहे. त्याचे कौतुकही होत आहे. पण,कांताराचं प्रमोशन उशिरा सुरू झाल्यामुळे मला चित्रपट बघायला वेळ मिळाला नाही. मी नक्कीच हा चित्रपट बघेन. आपली परंपरा, वनसंवर्धन याबद्दल चित्रपट तयार होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. असे चित्रपट लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत. हे चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करण्यास भाग पाडतात. त्यासोबत पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज असतात".


दशावतार या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी चित्रपटाची तुलना कांतारा सोबत केली. कांतारा आणि दशावतार हे दोन्ही चित्रपट समाजातील वास्तविक प्रश्न मांडत आहेत. त्यांचा विषय हा जल, जंगल आणि जमीन या त्रिसुत्री भोवती फिरत असला तरी चित्रपटाचे कथानक भिन्न दिसते. सध्या हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून कोटींमध्ये कमाई करत आहेत.

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या