बॉलिवूडने गमावला एक महान विनोदी अभिनेता

मुंबई : हिंदी सिनेमाच्या जगतात आपल्या खास विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४व्या वर्षी मुंबईत निधन झाले. जयपूरमध्ये १ जानेवारी १९४१ रोजी जन्मलेले असरानी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९६०च्या दशकात केली. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून त्यांचे कॉमिक टायमिंग आणि अभिनयशैली अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 'शोले' चित्रपटातील त्यांची 'जेलर' ही भूमिका आजही एक विनोदी आयकॉन मानली जाते. 'खट्टा मीठा', 'चुपके चुपके', 'भूल भुलैया', 'धमाल', 'वेलकम' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने हास्याचे क्षण दिले.


असरानी यांचे शिक्षण जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये झाले. त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर काही काळ रेडिओ कलाकार म्हणूनही काम केले. त्यानंतर अभिनयात रस वाढल्याने त्यांनी मुंबई गाठली. तिथे किशोर साहू आणि हृषिकेश मुखर्जी यांच्याशी झालेल्या भेटींमुळे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली.


'गुड्डी' या जया भादुरी अभिनीत चित्रपटातून असरानी यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची खरी सुरुवात केली. हा चित्रपट यशस्वी ठरला, आणि असरानी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. मात्र, सुरुवातीला त्यांना व्यावसायिक अभिनेता म्हणून स्वीकारले जात नव्हते, हे त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते. गुलजार यांच्यासारखे दिग्दर्शक देखील त्यांचा चेहरा 'चमत्कारिक' असल्याचे म्हणत होते. पण एकदा अभिनयात आपली जागा मिळाल्यावर असरानी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.


त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केले असून १९७२ ते १९८४ दरम्यान मुख्य भूमिकांमध्ये आणि नंतर २०१२ पर्यंत सहायक भूमिकांमध्ये झळकले. त्यांनी अभिनेत्री मंजू बंसल इराणी यांच्याशी विवाह केला होता, ज्यांच्यासोबत त्यांनी 'आज की ताजा खबर' आणि 'नमक हराम' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.


असरानी यांच्या निधनाने बॉलिवूडने एक हसतमुख, हसरा चेहरा गमावला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा शेअर केल्या होत्या, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या जाण्याचा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या