'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव होते. साताऱ्यात शूटींग सुरु असताना नदीत बुडून सौरभचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सौरभच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे रितेशने आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी रितेशने दिवाळीमध्ये सौरभच्या आईकडे त्याच्या इन्शुरन्सची रक्कम हस्तांतरित केली आहे. या मदतीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी रितेशचे आभार मानले आहेत.


“ज्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पैसे पाठवले, त्याच दिवशी सौरभ शर्माच्या आईच्या अकाऊंटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यात आले. रितेशच्या या कृतीचं आम्ही कौतुक करतो. सौरभच्या कुटुंबीयांसाठी त्याने केलेल्या मदतीतून त्याची माणुसकी स्पष्टपणे दिसून येते”, असे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे त्यांनी म्हटले आहे.


साताऱ्यातील संगम माहुली परिसरात रितेशच्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू होते. या गाण्यात हळदीचे दृश्य असल्यामुळे शूटींगमध्ये सर्वांच्या अंगाला आणि कपड्यांना हळद लागली होती. त्यामुळे जवळच नदी असल्याने सर्वजण नदीवर अंघोळीसाठी गेले होते . या नदीमध्ये भोवरे होते सौरभला या गोष्टीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडायला लागला. यानंतर दोन दिवस सौरभचा शोध सुरू होता. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या