दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नटरंगच्या १५ वर्षांनंतर येणार हा नवा चित्रपट ; दिगदर्शक रवी जाधव यांची घोषणा

मुंबई : नटरंग हा मराठी चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील गाणी आणि लावणी याची आजही प्रेक्षकांना भुरळ पडते. नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते आणि निर्मिती झी स्टुडिओजची होती. या अभूतपूर्व यशाला १५ वर्षे पूर्ण होत असतानाच नव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची टीम २०२६ मध्ये एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. 'फुलवरा' असे या चित्रपटाचे नाव आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियातून नव्या चित्रपटाची घोषणा केली. नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


तमाशा फडावरचे कलाकार मंचावर येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. पण त्यांचं खरं आयुष्य हे पडद्यामागे आहे आणि ते अतिशय अस्वस्थ करणारे असे आहे. यावर प्रकाश टाकणारे 'द फोक आख्यान' हा लोककलाविष्कार बघितला. त्या सादरीकरणाने भारावलेल्या रवी जाधव यांनी याच विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू केला, त्यातूनच 'फुलवरा' हा चित्रपट जन्माला आला.


'द फोक आख्यान' या बद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, हे ज्याच्या लेखन आणि निवेदनांन सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास हा थक्क करणारा आहे. आणि हर्ष- विजय या तरुण जोडगोळीला असलेली संगीताची जाण ही सुद्धा कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला थोडाफार अनुभव एकत्र आला आणि फुलवराची गोष्ट निर्माण झाली. अश्या प्रकारची गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर झी स्टुडिओज पेक्षा दुसरं उत्तम माध्यम नाही. त्यामुळे आम्ही नटरंग नंतर जवळपास १५ वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. दिवाळी हा सण परंपरा जपणारा आहे, साजरा करणारा आहे त्यामुळे या दिवाळीचा शुभ मुहूर्त साधून आम्ही या सिनेमाची घोषणा केली.


'फुलवरा' या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा - पटकथा आणि संवाद, गाणी ही ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष - विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवेलकर ( झी स्टुडिओज) आणि मेघना जाधव ( अथांग कॉम्युनिकेशन ) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हि गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ही गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढल्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या