Navnath Ban : 'खोटं बोला, रेटून बोला' हाच राऊतांचा पॅटर्न; पुरावे शून्य, केवळ अफवांचा बाजार नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा

"पराभव जवळ दिसताच राऊतांची सकाळची बडबड सुरू!" : नवनाथ बन


मुंबई : "मुंबई महानगरपालिकेत उबाठा आणि मनसेचा पराभव आता निश्चित झाला आहे. हा पराभव समोर दिसू लागल्यानेच संजय राऊत यांनी रोज सकाळी उठून बिनबुडाचे आरोप करण्याची आणि बडबड करण्याची प्रथा सुरू केली आहे," अशा बोचऱ्या शब्दांत भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी राऊतांचा समाचार घेतला. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पोलीस दलाचा सन्मान आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला आरसा दाखवला.



संजय राऊतांचा 'खोटे बोला, रेटून बोला' पॅटर्न


संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, "रोज नवे आरोप करायचे पण पुरावा एकही द्यायचा नाही, हा राऊतांचा जुना पॅटर्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाच्या घोडदौडीवर अशा बालिश आरोपांचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, तर उबाठा गट आता राजकीयदृष्ट्या पूर्णपणे अप्रासंगिक झाला आहे."



पोलिसांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही


महाराष्ट्र पोलीस दलाचा उल्लेख 'टोळी' असा करणाऱ्या संजय राऊतांवर बन यांनी संताप व्यक्त केला. "दिवस-रात्र जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या खाकी वर्दीचा 'टोळी' म्हणून अपमान करणे ही उबाठाची संस्कृती आहे. पोलिसांना 'घरघडी' म्हणणाऱ्यांची ही परंपरा महाराष्ट्र आणि येथील जनता कधीही सहन करणार नाही. पोलिसांवर टीका करणे म्हणजे संपूर्ण पोलीस दलाचा आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.



गुंडगिरी आणि वसुलीची भाषा कुणी करावी?


"ज्यांनी सचिन वाझेसारख्याला 'लादेन' म्हणून पाठिशी घातले आणि 'वसुली सरकार' चालवले, त्यांना गुंडगिरीची भाषा शोभत नाही. गुंडांना अभय देण्याचे पाप उबाठाने केले आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये कायद्याचे राज्य असून गुंडांना येथे कोणताही थारा नाही," असे म्हणत त्यांनी गुंडगिरीच्या आरोपांना उत्तर दिले. सातारा प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ बदनामीसाठी हा खोटा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



तुमचे हिंदुत्व 'खिचडी घोटाळ्या'चे!


हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारले. "मुस्लिम मोर्चे काढणे, उर्दू भवन उभारणे आणि अजान स्पर्धा घेणे हे तुमचे कोणते हिंदुत्व आहे? पत्राचाळ घोटाळा आणि गरिबांची खिचडी चोरणे हे तुमचे हिंदुत्व का? आमचे हिंदुत्व राम मंदिर उभारण्याचे आणि कलम ३७० हटवण्याचे आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही," असा टोला त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन