Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार


मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार! शिंदेंची काळ्या दगडावरची भगवी रेघ


मुंबई : "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून, आजची सभा हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रचाराचा शंखनाद केला. वांद्रे येथील 'डोम'मध्ये आयोजित महायुतीच्या महासभेत ते बोलत होते.


?si=5KC5GhFrVXHqcGtB

भ्रष्टाचाराच्या बकासुरापासून मुंबईची सुटका


एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "ही सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी ललकारी आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचे आहे. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मिळून मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवतील. मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."



'म' मलिद्याचा की मराठीचा? शिंदेंचा टोला


उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य जवळीकीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "जनतेने यांचा सीझन संपवल्यानंतर यांना आता व्हिजन आठवले आहे. यांनी मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे. यांचा 'म' हा मराठीचा नसून 'मलिद्याचा' आहे. आमचा 'म' मात्र मराठी, महाराष्ट्र आणि महायुतीचा आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेने बँड वाजवल्यानंतर यांना ब्रँडची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सामान्य कार्यकर्ता आहे.



सूर्याजी पिसाळ कोण? टीकेला प्रत्युत्तर


'उबाठा' गटाकडून होणाऱ्या सूर्याजी पिसाळ या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे आक्रमक झाले. "बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की विचारांचा खून करणारे सूर्याजी पिसाळ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या वेळी माझ्या विनंतीवरून देवेंद्रजींनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला, पण हे लोक सत्तेसाठी लाचार झाले. आम्ही सत्तेसाठी गेलो नाही, तर मंत्रिपदावर पाणी सोडून तत्त्वासाठी बाहेर पडलो. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.



विकासाचे वारकरी हवेत, मारेकरी नकोत


शिंदे यांनी संभाजीनगरमधील उमेदवारीवरूनही ठाकरेंना घेरले. "संभाजीनगरमध्ये रशीद मामूला तिकीट दिले, आज बाळासाहेब असते तर यांना उलटे टांगून फटके दिले असते," असे ते म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करण्याचा जमाना आता गेला आहे. मुंबईकरांना आता शहराचे मारेकरी नकोत, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन