काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७ हक्काच्या जागा गमवाव्या लागल्याची मतमोजणीदरम्यान माहिती समोर आली आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने मिळवलेली मते ही थेट उबाठा गट आणि मनसेसाठी घातक ठरली आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत ‘मुंबई विकास आघाडी’ स्थापन केली होती. या आघाडीने विशेषतः मुस्लीम आणि दलित बहुल प्रभागांमध्ये स्वतंत्र ताकद लावली. मात्र, या ताकदीचा मोठा फटका उबाठा आणि मनसेला बसल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे दीपक तावडे (१०,२५८ मते) विजयी झाले, तर मनसेचे दिनेश साळवी (७,५३०) आणि काँग्रेसचे मस्तान खान (३,३५१) यांच्यातील मतविभाजनामुळे मनसेचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक २३ मध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. भाजपचे शिवकुमार झा (७,०९०) विजयी झाले, तर मनसेचे किरण जाधव (५,८१०) आणि काँग्रेसचे आर.पी. पांडे (१,३१७) यांच्यातील मतविभाजन मनसेच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

कुठे काय घडले?

  1. प्रभाग क्रमांक ५२ मध्ये भाजपच्या प्रीती सातम (९,९७१) यांनी उबाठा गटाच्या सुप्रिया गाडावे (८,९५३) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या स्वाती सांगळे यांना मिळालेली १ हजार ३९९ मते निर्णायक ठरली.

  2. प्रभाग १२६ मध्येही भाजपच्या अर्चना भालेराव (११,१३४) यांनी उबाठा गटाच्या शिल्पा भोसले (१०,२६३) यांच्यावर मात केली. काँग्रेसच्या साजिदा खान यांना मिळालेली १ हजार ६५ मते उबाठा गटासाठी घातक ठरली.

  3. प्रभाग क्रमांक १६६ मध्ये शिवसेनेच्या मीनल तुर्डे (६,४३५) विजयी झाल्या, तर मनसेचे राजन खैरनार (४,४८०) आणि काँग्रेसचे घनश्याम भापकर (३,२८६) यांच्यातील मतविभाजनाने मनसेची संधी हिरावली.

  4. प्रभाग क्रमांक १७४ मध्ये भाजपच्या साक्षी कनोजिया (५,५२३) यांनी उबाठा गटाच्या पद्मावती शिंदे (३,०७८) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या ईश्वरी वेलू (२,९२१) यांची मते निर्णायक ठरली.

  5. वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर (६,८९५) विजयी ठरल्या, तर काँग्रेसच्या ललिता यादव (६,६४६) आणि मनसेच्या अर्चना कासले (२,७५९) यांच्यातील मतविभाजनाचा ठाकरे गटाला अप्रत्यक्ष फटका बसला.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन