महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर सुसाट धावत आहे. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, प्रगत आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे अंतिम ध्येय आहे. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी व्यक्त करत, दादांनी नेहमीच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे नमूद केले.



गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा 'नंबर वन' :


औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम असून, राज्य आजही देशात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १३.५% इतका मोठा आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याने १ लाख ६४ हजार ८७५ कोटींची परकीय गुंतवणूक खेचून आणली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ३९% आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.



दावोस करारांची यशस्वी अंमलबजावणी :


केवळ कागदावर करार न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ९१ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे. दावोस येथे झालेल्या ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक करारांपैकी तब्बल ८२% करार आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. यामुळे आगामी काळात एआय (AI), सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत महाराष्ट्र क्रांती करेल.



पायाभूत सुविधा आणि 'गेमचेंजर' प्रकल्प :


मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती देताना उपमुख्यमंत्र्यांनी 'वाढवण बंदर' आणि 'जागतिक क्षमता केंद्रा'चा उल्लेख केला. पालघरमधील वाढवण बंदर हे भविष्यात ५० लाख रोजगार निर्माण करणारे ठरेल. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे दळणवळण वेगवान झाले असून, उद्योगांसाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी राज्याला मिळाली आहे.



घराघरात पोहोचणार उद्योग :


विकास केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न ठेवता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे धोरण सरकारने आखले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची, तर अहिल्यानगरमध्ये ११ हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर हे शहर 'स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी' म्हणून विकसित होत असून, ते भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) सर्वात मोठे हब बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



२०२६ हे 'भरती वर्ष'; तरुणांसाठी रोजगाराची संधी :


राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२६ हे वर्ष 'भरती वर्ष' म्हणून साजरे केले जाणार असून, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण केल्या जात आहेत. 'जीपीआर २.०' सारख्या उपक्रमांतून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.