अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला 'प्राथमिक तपास अहवाल' (Preliminary Investigation Report) आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) सुपूर्द करणार असून, यातून अपघाताच्या नेमक्या कारणांवरून पडदा उठण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे, कारण हा तपास केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून गुन्हेगारी कोनातूनही केला जात आहे. या तपासाचा मुख्य आधार विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' असून, तो सुदैवाने सुरक्षित मिळाला आहे. त्यामध्ये रेकॉर्ड झालेले वैमानिकाचे शेवटच्या क्षणांचे संभाषण आणि विमानाचा तांत्रिक डेटा यातून विमानाचे इंजिन हवेत असतानाच निकामी झाले होते का, याचे उत्तर मिळणार आहे. याशिवाय, ज्या खासगी कंपनीकडे विमानाची जबाबदारी होती, त्या 'VSR व्हेंचर्स' ने विमानाची वेळेवर आणि योग्य प्रकारे देखभाल केली होती का? की यामागे काही तांत्रिक हलगर्जीपणा होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अहवालातून समोर येतील. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा सत्य वृत्तांत समोर येण्यासाठी आता काही तासांचीच प्रतीक्षा उर्ती आहे


आमदार रोहित पवार यांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणातील ठोस पुरावे समोर आणण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीआयडी (CID) या प्रकरणाचा समांतर तपास करत असून तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. आज सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अहवालाच्या आधारावरच या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा एफआयआर (FIR) दाखल करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय सीआयडी घेणार आहे. त्यामुळे या तांत्रिक अहवालाकडे आता केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.



VSR व्हेंचर्स'ला मोठा दणका


विमान अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिटमध्ये सुरक्षिततेच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. याची तातडीने दखल घेत DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) ने संबंधित विमान कंपनीची उर्वरित पाचही विमाने तूर्तास 'ग्राऊंडेड' केली आहेत, म्हणजेच त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कंपनीच्या कामकाजातील या उणिवांमुळे संशयाची सुई आता व्यवस्थापनाकडे वळली आहे. अशा परिस्थितीत, आज सायंकाळी येणारा तांत्रिक तपास अहवाल हा केवळ अपघाताचे कारणच स्पष्ट करणार नाही, तर या कंपनीसाठी आणि संपूर्ण तपासासाठी एक 'टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.

Comments
Add Comment

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार