Nitesh Rane : वापरात नसलेल्या जहाजांमधून कोट्यवधींचा महसूल; मंत्री नितेश राणेंकडून ‘शिप रीसायकल’ धोरणाला गती

मुंबई : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापर प्रक्रियेला गती देत महसूलवाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने जहाज पुनर्वापरासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले.


मंत्रालयात जहाज पुनर्वापरासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच श्री राम ग्रीन शिप रिसायकलिंग इंडस्ट्रीज Shree Ram Green Ship Recycling Industries (Unit-II) LLP चे प्रतिनिधी उपस्थित होते. (Nitesh Rane)



यावेळी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, राज्यातील अनेक बोटी आणि जहाजे दीर्घकाळ वापरात नसल्याने ती बंदर परिसरात पडून आहेत. अशा जहाजांच्या पुनर्वापरातून पर्यावरण संरक्षणास मदत होण्यासोबतच स्क्रॅप प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर महसूलही मिळू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसाठी सक्षम आणि पारदर्शक धोरण तयार करण्यावर सरकार भर देत आहे.



त्यांनी संबंधित कंपनीला राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापराबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः इनलँड व्हेसल आणि मोठ्या जहाजांसाठी ‘वन विंडो सिस्टीम’ विकसित करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रणालीमुळे जहाज पुनर्वापर प्रक्रियेला वेग मिळेल, तसेच आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. (Nitesh Rane)



यासंदर्भात विभागाकडून सखोल अभ्यास केला जाणार असून आगामी बोर्ड बैठकीत याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. तसेच स्क्रॅपमध्ये काढण्यात येणाऱ्या बोटी आणि जहाजांची शॉर्टलिस्ट तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. (Nitesh Rane)


या उपक्रमामुळे राज्यातील सागरी क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून जहाज पुनर्वापर उद्योगाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि महसूल वाढ या तिन्ही बाबींमध्ये हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन