Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्यामुळे मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Nitesh Rane)



कोकणातील आंबा, काजू आणि भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित विशेष प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, बारामती येथील एआय संस्थेसोबत करार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीतून २.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शेतीत एआयच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी प्रयोग केले जाणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Sindhudurg)



मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्याने कर्जमाफी, वीजबिल माफी आणि इतर कृषी योजनांचा लाभ मत्स्यव्यावसायिकांनाही मिळावा यासाठी शासन निर्णय (CR) लवकरच जारी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागात प्रत्येकी ४५० पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, पहिल्या टप्प्यात २४० पदांची भरती जाहीर करण्यात आल्याची माहिती देत अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.