Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा!

- मंत्री नितेश राणे यांची टीका; ज्यांना 'बेस्ट'ची निवडणूक जिंकता आली नाही त्यांनी भाजपवर बोलू नये


मुंबई : बिहारमधील पोटनिवडणुकीतील पराभवावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपवर बोलण्यापेक्षा आधी स्वतःचा वरळी मतदारसंघ सांभाळावा, २०२९ ची निवडणूक त्यांना अत्यंत कठीण जाणार आहे, असा टोला राणे यांनी लगावला. ( Aditya Thackeray)


एका पोटनिवडणुकीतील पराभवाने विरोधकांना खूप आनंद झाला असला तरी जनमताचा नेहमीच आदर केला पाहिजे, असे सांगत नितेश राणे म्हणाले की, नुकतीच मुंबईत झालेली 'बेस्ट' पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. दोन्ही ठाकरे एकत्र लढूनही तोंडावर आपटले, मग आता मराठी माणसाने यांना लाथ मारून हकलवून लावले असे आम्ही म्हणायचे का, असा सवाल त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार आले असून आमचा मुख्यमंत्री तेथे बसला आहे, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.


राज्यात नव्याने लागू झालेल्या 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचे' स्वागत करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण करत हा कायदा अधिवेशनात संमत करण्यात आला असून राष्ट्रपतींचीही त्याला मंजुरी मिळाली आहे. या कायद्यामुळे राज्यातील हिंदू माता-भगिनींकडे नावाने वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. (BJP Maharashtra)




जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ७ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत बोलताना राणे यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद असून, बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांवर नक्कीच मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या होत्या आणि पुढेही सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी