BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण थांबवावे


मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राला महाराष्ट्र भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभ्यासपूर्ण किंवा निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा नसली, तरी महाराष्ट्रातील जनतेसमोर काही सत्य आकडेवारी आणि वास्तव मांडणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. (Rahul Gandhi)


विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनांचा संदर्भ राहुल गांधींनी पत्रात दिला आहे, त्या आदिवासी शाळा प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांकडूनच चालवल्या जात आहेत, असा दावा भाजपने केला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या शाळेत तीन तरुणींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्या शाळेचे संचालक माजी काँग्रेस खासदार मारोतराव कोवासे हे आहेत, तर त्यांचे सुपुत्र आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे हे या शाळेचे सचिव आहेत, अशी माहिती भाजपने दिली. तसेच, यवतमाळमधील चिंधुजी लक्ष्मणराव पुरके आश्रम शाळेच्या तपासणीदरम्यान मुलींच्या स्वच्छतागृहांना दारेच नसल्याचे उघडकीस आले होते, आणि ही शाळा माजी मंत्री तथा काँग्रेस नेते वसंत पुरके यांच्या माध्यमातून चालवली जाते, असेही पत्रात म्हटले आहे. (BJP)



काँग्रेस सत्तेत असताना या शाळांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप भाजप केला आहे. वर्षानुवर्षे आदिवासी समुदायाचे शोषण करणारेच लोक आता स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. या काँग्रेस नेत्यांवर होणारी कारवाई रोखण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. (BJP VS Congress)

आधी तेलंगणा आणि कर्नाटकात सुधारणा करा


आधी गैरप्रकार करायचे आणि नंतर त्यावर कारवाई झाल्यावर गोंधळ घालायचा, हा काँग्रेसचा ठरलेला पॅटर्न जनतेला आता चांगल्या प्रकारे समजला आहे. ही नौटंकी थांबवून काँग्रेस नेत्यांना पाठीशी घालणे बंद करावे, असे सांगत महाराष्ट्र सरकार आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे भाजपने स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधींनी महाराष्ट्रावर बोलण्याआधी स्वतःची सत्ता असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील आदिवासी कल्याण विभाग व वसतिगृहांची दुरवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे, असा उपरोधिक सल्लाही देण्यात आला आहे. ( Maharashtra News)








Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.