Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा, दुसऱ्या हप्त्यात 348 कोटी जमा

Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 424 कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर एकूण 348 कोटी 51 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या 66 हजार 139 शेतकऱ्यांना 627 कोटी 47 लाख 26 हजार 562 रुपयांचा लाभ मिळाला होता. आता दुसरा हप्ताही वितरित झाल्याने जिल्हा बँकेच्या कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 2 हजार 563 वर पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एकूण 975 कोटी 98 लाख 48 हजार 631 रुपये जमा झाले आहेत. (Ahilyanagar News)



कर्जाच्या ओझ्याखालील शेतकऱ्यांना मोठा आधार


जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबतच राष्ट्रीय आणि व्यापारी बँकांच्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेच्या 1 लाख 2 हजार 563 आणि राष्ट्रीय व व्यापारी बँकांच्या 12 हजार 652 अशा एकूण 1 लाख 15 हजार 215 शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 1 हजार 114 कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्जमाफीमुळे पीक कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागणारा खर्च, शेतीची मशागत आणि इतर आर्थिक नियोजन करण्यासाठी या मदतीचा फायदा होणार आहे. (Ahilyanagar News)



दुसर्‍या हप्त्यात तालुकानिहाय लाभ


दुसऱ्या हप्त्यात अकोले तालुक्यातील 1 हजार 835 शेतकऱ्यांना 16 कोटी 58 लाख 96 हजार रुपये, जामखेडमधील 2 हजार 446 शेतकऱ्यांना 2 कोटी 36 लाख 19 हजार रुपये, कर्जतमधील 2 हजार 61 शेतकऱ्यांना 20 कोटी 88 लाख 40 हजार रुपये आणि कोपरगावमधील 628 शेतकऱ्यांना 6 कोटी 18 लाख 72 हजार रुपयांचा लाभ मिळाला. अहिल्यानगर तालुक्यातील 1 हजार 841 शेतकऱ्यांना 15 कोटी 80 लाख 43 हजार रुपये, पारनेरमधील 1 हजार 446 शेतकऱ्यांना 10 कोटी 7 लाख 92 हजार रुपये, पाथर्डीतील 2 हजार 68 शेतकऱ्यांना 16 कोटी 13 लाख 42 हजार रुपये आणि राहाता तालुक्यातील 794 शेतकऱ्यांना 6 कोटी 34 लाख 23 हजार रुपये मिळाले.तर संगमनेर तालुक्यातील 1 हजार 536 शेतकऱ्यांना 13 कोटी 42 लाख 90 हजार रुपये आणि श्रीरामपूरमधील 1 हजार 654 शेतकऱ्यांना 14 कोटी 46 लाख 3 हजार रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. (Ahilyanagar News)



सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात


दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख २ हजार २७३ असून, त्यांच्या खात्यावर २ हजार २८४ कोटी ४४ लाख ६ हजार ५९० रुपये वितरित करण्यात आले. या विभागात बीडमध्ये ४०० कोटी ३२ लाख, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८७ कोटी ३२ लाख, धाराशिवमध्ये १८३ कोटी ८५ लाख, हिंगोलीमध्ये १९५ कोटी ६१ लाख, जालन्यात ३६६ कोटी २७ लाख, लातूरमध्ये १२१ कोटी ७ लाख, नांदेडमध्ये ३८१ कोटी ९४ लाख आणि परभणीत ३४८ कोटी २ लाख रुपये वितरित करण्यात आले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.