CM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं ‘Growth Engine’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअप आणि उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम इनक्युबेशन सेंटर उभारावीत. विद्यापीठांमधून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)


फडणवीस म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पदवी देण्यापेक्षा रोजगारक्षम आणि कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्यावर भर द्यावा. नाशिक उपकेंद्रात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही त्यांनी केली. विद्यापीठातील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)



नाशिकच्या औद्योगिक विकासावर बोलताना फडणवीस यांनी कृषी, द्राक्ष उत्पादन व निर्यात, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)


मुंबई-पुणे-नाशिक हा महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा त्रिकोण असून, पुढील पाच वर्षांत नाशिक राज्याचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.



६२ एकर जागेवर उभारले उपकेंद्र


दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी ६२ एकर जमीन उपलब्ध झाली असून, त्यापैकी ४० एकर जमीन सध्या उपकेंद्राच्या ताब्यात आहे. ३३ हजार चौरस फुटांच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर, संगणक आणि इतर सुविधांसह सुमारे १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. (CM Devendra Fadnavis)


या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यासह दादरा आणि नगर हवेली, सिल्व्हासा यांचा समावेश आहे. उपकेंद्रांतर्गत १९६ महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था, सुमारे २,६०० शिक्षक आणि अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. सध्या एमबीए, बीबीए, मंदिर व्यवस्थापन आणि कार्यकारी एमबीए यांसारखे अभ्यासक्रम सुरू आहेत. (CM Devendra Fadnavis)


भविष्यात तंत्रज्ञान व विधी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, विविध संशोधन केंद्रे आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.