पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. मोदी विदेश दौऱ्यावर असल्यामुळे यावेळी कार्यक्रम आधीच ध्वनीमुद्रीत (प्री रेकॉर्डेड प्रोग्रॅम) केला होता. यंदाच्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी व्यसनमुक्ती मोहिमेसह सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी 'भारत छोडो' आंदोलनासह स्वातंत्र्य लढ्याचाही उल्लेख केला.


https://www.prahaar.in/2026/08/30/indian-standard-time-to-be-mandatory-across-the-country-from-march-2027/


कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी मुंबईचे कृष्णा शेषाद्री चालवत असलेल्या 'भारतराज्य.कॉम' या वेबसाइटचा उल्लेख केला. या वेबसाइटवर तुम्ही कोणतेही वर्ष निवडून त्या वेळी भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, हे पाहू शकता. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी कृष्णा शेषाद्री यांच्याशी फोनवर संवादही साधला. तसेच पंतप्रधानांनी त्यांना ही कल्पना कुठून सुचली, असेही विचारले. पंतप्रधानांनी कृष्णा शेषाद्री यांचे कौतुक केले.


https://www.prahaar.in/2026/08/30/indias-fourth-aircraft-arrived-in-nepal-with-11-tonnes-of-relief-material/


व्यसनमुक्ती मोहिमेचाही पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केला. देशातील तरुण व्यसनमुक्ती मोहिमेचा भाग बनत आहेत. ही चांगली बाब असल्याचे मोदी म्हणाले. अमली पदार्थांच्या व्यसनाचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे व्यसनाच्या विळख्यातून देशातील तरुण पिढी बाहेर पडणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी तरुणांना घोषणा, गाणी आणि नाटकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.


https://www.prahaar.in/2026/08/30/prime-minister-modi-conferred-uzbekistans-highest-honor-oliy-darajali-dostlik/


स्वातंत्र्य दिन, राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन यांसारखे प्रसंग देशवासियांमध्ये अभिमानाची भावना जागृत करतात, असे सांगत पंतप्रधान मोदींनी वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनाचाही उल्लेख केला आणि सांगितले की, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनामुळे हे वर्ष अधिकच विशेष झाले आहे. त्यांनी सांगितले की, 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत आतापर्यंत ८ कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. त्यांनी सूर्यपथ तिरंगा अभियानाचाही उल्लेख केला.


https://www.prahaar.in/2026/08/30/kyiv-ukraine-weapons-depot-explosion-drone-attack-on-weapons-depot-near-kyiv-37-killed-and-42-injured-in-massive-explosion/


पीएम स्वनिधी योजनेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या योजनेने महिलांना कसे सक्षम केले आहे हे सांगितले. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ४६ टक्के महिला आहेत. त्यांनी गाझियाबादच्या बबिता शर्मा यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्या पूजेचे साहित्य विकायच्या, पण पीएम स्वनिधी योजनेमुळे त्यांना मदत मिळाली आणि आता त्यांच्या स्टॉलचे दुकानात रूपांतर झाले आहे.


https://www.prahaar.in/2026/08/30/us-shooting-shooting-in-a-us-park-two-people-including-the-suspect-and-a-police-officer-killed-another-officer-injured/


पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाबद्दल भाष्य केले. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, उत्तम कुमार यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि लोकांच्या मनात आपले स्थान कायमचे कोरले आहे. सणांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी 'व्होकल फॉर लोकल'चा अवलंब करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. त्यांनी कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सना 'व्होकल फॉर लोकल'ला चा अवलंब करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. त्यांनी कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सना 'व्होकल फॉर लोकल'ला प्रोत्साहन देण्याचे आणि इतरांनाही असे करण्याचे आवाहन केले.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी